Jayant Naralikar Passed Away: ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डाॅ. जयंत विष्णू नारळीकर यांचे आज(२० मे रोजी) पहाटे निधन झाले आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाआहे. जयंत नारळीकर हे भारतातील प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, विज्ञान लेखक आणि विज्ञान कथाकार म्हणून ओळखले जात होते. त्यांनी विश्वाची उत्पत्ती, गुरुत्वाकर्षण आणि काळ-प्रकाशाच्या परस्परसंबंधांवर महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे.
जयंत नारळीकर यांचा जन्म 19 जुलै 1938 रोजी कोल्हापूरमध्ये झाला होता. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून गणित विषयात बी.एस्सी. आणि एम.एस्सी. पूर्ण केली होती. पुढे त्यांनी ब्रिटन येथील केंब्रिज विद्यापीठातून खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकीमध्ये पीएच.डी. मिळवली होती. केंब्रिज विद्यापीठातून भारतात आल्यानंतर त्यांनी भौतिकविज्ञान, खगोलविज्ञानाच्या प्रसारासाठी १९८८ मध्ये ‘आयुका'(Inter-University Centre for Astronomy and Astrophysics) संस्थेची पुण्यात उभारणी केली. पुढे जाऊन ही आयुका संस्था भारताचे ज्ञानवैभव ठरली.
जयंत नारळीकरांचे संशोधन( Research by Jayant Narlikar):
– ब्रिटीश खगोलशास्त्र सर हॉईल आणि डॉ. नारळीकर यांनी खगोलशास्त्रात एकत्र संशोधन केले आहे. त्या दोघांनी मिळून संशोधन करून जो सिद्धांत मांडला, तो ‘हॉईल-नारळीकर सिद्धांत’ या नावाने खगोलशास्त्रात ओळखला जातो. हा सिद्धांत विश्वाच्या स्थिर स्थिती मॉडेलमध्ये येतो. म्हणजेच हा सिद्धांत सापेक्षतावाद आणि क्वांटम यांत्रिकि यांचा समन्वय साधण्याता प्रयत्न करतो.
नारळीकरांचा पॅनस्पर्मिया सिद्धांत(panspermia theory असा प्रस्ताव देतो की,धूमकेतू हे जीवनाचे प्राथमिक वाहक आहेत आणि ते ग्रहांवरून कठोर जीवाणू आणि इतर जीवसृष्टी निर्माण करतात. अर्थातच नारळीकरांनी सांगितले की, अंतरळातील धूळकणांवर जीवसृष्टीचा उगम झाल्याची शक्यता आहे.
– जयंत नारळीकरांनी काळाच्या प्रवाहाचा भौतिक अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा सिद्धांत Time Asymmetric म्हणून ओळखला जातो.
– एकंदरित वैज्ञानिक क्षेत्रात स्थूलविश्वाचा उगम व बदलत्या स्वरूपावरचे त्यांचे संशोधन मोलाचे ठरले.
डाॅ. जयंत नारळीकरांविषयी काही खास गोष्टी:
विशेष म्हणजे जयंत नारळीकरांनी सोप्या भाषेत विज्ञान समजून सांगण्याचा प्रयत्न केला यासाठी त्यांनी विज्ञानकथा आणि विज्ञानविषयक अनेक पुस्तके लिहिली. यक्षांची देणगी त्यांच्या या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला होता. तसेच त्यांनी चला जाऊ अवकाश सफरीला, टाइम मशीनची किमया, “व्हायरस यांसारख्या विज्ञानकथा लिहिल्या. तर विश्वाची रचना, विज्ञानाची गरुडझेप यांसारख्या पुस्तकातून त्यांनी विज्ञानविषयक माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला.
-२०२१ मधे नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
-त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारने १९६५मध्ये त्यांना पद्मभूषण, तर २००४मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.
-नारळीकर यांना महाराष्ट्रभूषण पुरस्काराने सुद्धा गौरविण्यात आले .
दरम्यान, डॉ. जयंत यांचे जाणे हे केवळ वैज्ञानिक क्षेत्रासाठी नाही, तर संपूर्ण देशासाठी मोठे नुकसान आहे.त्यांनी सुरू केलेले विज्ञानप्रसाराचे कार्य पुढे सुरू ठेवणे आणि विज्ञानवादी दृष्टीकोन समाजात रुजवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.