Indias Defence Export: भारताने ‘ऑपरेशन सिंदूर'(0peration Sindoor) अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे अचूकपणे लक्ष्य करत नष्ट केले. त्यामुळे दहशतवादी नेटवर्कला मोठा धक्का बसला. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला केला तेव्हा भारताने त्याला प्रत्युत्तर देत पाकिस्तानाची लढाऊ विमाने पाडून हल्ला परतवून लावला. या दरम्यान भारताने पाकिस्तान विरोधात विविध प्रकारची स्वदेशी शस्त्रे वापरली. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरमधून भारताची लष्करी ताकदच नाही तर शस्त्र सज्जता देखील दिसून आली. यानिमित्ताने भारताच्या शस्त्रसज्जेची ताकद संपूर्ण जगापर्यंत पोहचली. त्यामुळे जगभरातून आता भारताकडे शस्त्रांची मागणी वाढली आहे. अर्थातच ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या संरक्षण निर्यातीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आपण भारताच्या संरक्षण निर्यातीची सविस्तर माहिती आजच्या या लेखातून घेऊयात.
भारतीय संरक्षण निर्यातीची आकडेवारी:
-गेल्या दशकात भारताच्या संरक्षण निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे.
-नुकतीच संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार,आर्थिक वर्ष २०१४ मध्ये ६८६ कोटी रुपयांची संरक्षण निर्यात झाली होती. तर २०२५ या आर्थिक वर्षात २३,६२२ कोटी रुपयांची संरक्षण निर्यात भारताकडून झाली आहे.
– या आकडेवारीतून स्पष्ट होते की गेल्या दशकात भारताच्या संरक्षण निर्यातीत ३४ टक्के वाढ झाली आहे.
– संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारताने जवळजवळ ८० देशांमध्ये दारूगोळा, शस्त्रे, प्रणाली,उपप्रणाली आणि घटकांसह विविध प्रकारच्या संरक्षण वस्तूंची निर्यात केली आहे.
India’s #DefenceExports surged from Rs 686 crore in 2013-14 to Rs 23,622 crore in 2024-25, a 34-fold increase. In 2024-25, private sector exports were Rs15,233 crore, and DPSUs Rs 8,389 crore, with DPSU exports growing 42.85%. Export authorisations rose by 16.92%, and exporters… pic.twitter.com/yDVYAwajxG
— Ministry of Defence, Government of India (@SpokespersonMoD) May 13, 2025
भारत सरकारची संरक्षण निर्यातीला प्रोत्साहन देणाऱ्या भूमिका:
-खरेतर गेल्या दशकात भारताच्या संरक्षण क्षेत्रात झालेली वाढ भारत सरकारच्या धोरणात्मक सुधारणा, खाजगी क्षेत्राचा सहभाग आणि तांत्रिक प्रगती याद्वारे एकत्रित प्रयत्नांचे प्रतिबिंब म्हणावे लागेल.
-सरकारने संरक्षण उपकरणांच्या निर्यातीसाठी नियम सुलभ केले आहेत.
-सरकारने औद्योगिक परवाना प्रक्रियेत सरलीकरण आणले आहे.
– आंतरराष्ट्रीय संरक्षण प्रदर्शनात उपकरणे प्रदर्शित करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
-तसेच निर्यात अधिकृतता प्रक्रियेत डिजिटायझेशन आणले आहे. अशाच सरकारच्या काही महत्वाच्या धोरणांमुळे भारताच्या संरक्षण निर्यातीत वाढ झाली आहे.
-विशेष म्हणजे केंद्र सरकारने संरक्षण क्षेत्रासाठी 2024-25 साठी 6.21 लाख कोटी रुपये दिले. तर २०२३-२४ या आर्थिक वर्षात हा निधी 5.94 लाख कोटी होता. यावरून स्पष्ट होते की केंद्र सरकार संरक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीत दिवसेंदिवस वाढ करत आहे.
भारताने ‘ऑपरेशन सिंदूरमध्ये आणि पाकिस्तानविरोधात वापरलेली काही महत्वाची शस्त्रे:
– ब्रह्योस नावाचे एक सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र
-लोइटरिंग म्युनिशन
-स्कॅल्प/स्टॉर्म शॅडो क्रूझ मिसाईल
-हॅमर एअर-टू-ग्राउंड बॉम्ब
-डी४ अँटी-ड्रोन सिस्टम
-आकाश मिसाईल
-१४ मे रोजी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने पाकिस्तानी लष्करी आस्थापनांविरुद्ध भारताच्या हल्ल्याबद्दल माहिती दिली. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानवर केलेले सर्व हल्ले भारतीय मालमत्तेचे नुकसान न होता करण्यात आले असून यातून भारताची देखरेख, नियोजन आणि वितरण प्रणालीची प्रभावीता अधोरेखित होते. विशेष म्हणजे लांब पल्ल्याच्या ड्रोनपासून ते मार्गदर्शित युद्धसामग्रीपर्यंत आधुनिक स्वदेशी तंत्रज्ञानाच्या वापरामुळे हे हल्ले अत्यंत प्रभावी आणि कॅलिब्रेटेड झाले, असे देखील या माहितीत नमूद करण्यात आले आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर संरक्षण निर्यातीत वाढ:
-खरेतर ऑपरेशन सिंदूरनंतर ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली जास्त प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.
-उपलब्ध माहितीनुसार,व्हिएतनाम भारतासोबत ब्राह्मोस क्षेपणास्त्रे खरेदी करण्यासाठी करार करण्याच्या तयारीत आहे.
-मलेशियाही त्यांच्या लढाऊ विमानांना आणि युद्धनौकांना क्षेपणास्त्र प्रणालीने सुसज्ज करण्यासाठी भारतासोबत करार करण्याच्या मार्गावार आहे.
– विशेष म्हणजे थायलंड, सिंगापूर, ब्रुनेई, ब्राझील, चिली, अर्जेंटिना, व्हेनेझुएला, इजिप्त, सौदी अरेबिया, युएई, कतार आणि ओमानसह इतर अनेक देशांनीही ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्याची तयारी दाखवल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
-याशिवाय डोर्नियर-228, एलसीए तेजस आणि एएलएच विमाने, तोफखाना,चिलखती वाहने, भारतीय पाणबुड्या, युद्धनौका, तेज इंटरसेप्टर बोट, हलके टॉरपीडोची खरेदी वाढली आहे.
– अर्थातच केवळ शस्त्रास्त्रच नाही तर चिलखतापासून ते इतर सुरक्षा प्रणालींची निर्यात सुद्धा वाढली आहे.
भारतीय संरक्षण निर्यातीत वाढ झाल्यानंतर शेअरही वाढले:
-ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारताच्या संरक्षण कंपन्यांना जगभरातनून ऑर्डर मिळू लागल्यानंतर संरक्षण कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
– ९ मे पासून संरक्षण शेअर्समध्ये तब्बल १.८ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
-ड्रोन उत्पादक कंपनी आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी शेअर सध्या आघाडीवर दिसत आहेत. या कंपनीच्या शेअर्समध्ये अलीकडेच ५६% वाढ झाल्याचे दिसत आहे.
-युद्धनौका बनवणारी कंपनी ‘कोचीन शिपयार्ड’चे शेअर्स ४१% टक्क्यांनी वाढले आहेत.
-तेजस जेट्स आणि ध्रुव हेलिकॉप्टर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये १६% वाढ झाली आहे.
-ऑपरेशन सिंदूरमध्ये स्वदेशी शस्त्रांच्या यशामुळे गुंतवणूकदारांना आता आशा आहे की, सरकार संरक्षण क्षेत्राला अधिक ऑर्डर देईल त्यामुळे शेअर्सच्या किमती वाढत आहेत.
दरम्यान,जागतिक संरक्षण बाजारपेठेत भारताचे स्थान मजबूत करण्यासाठी सरकारने आता २०२९ पर्यंत वार्षिक ५०,००० कोटी रुपयांच्या संरक्षण निर्यातीचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. या सगळ्यावरून स्पष्ट होते की, भारत संरक्षण क्षेत्रात मोठी भरारी घेण्याच्या तयारीत आहे. आता भारत केवळ शस्त्र निर्मिती आणि विक्रीत आत्मनिर्भरच होत नाही तर मोठा निर्यातदार होण्याच्या मार्गावर आहे.