Operation Sindoor:एकीकडे ज्योती मल्होत्रासारखे युट्यूबर्स फक्त पैशासाठी देशाशी गद्दारी करत असल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे मात्र माध्यमांमधून व्यक्त होणारी मंडळी भारताच्या यशाबद्दल आपल्या शो मधून भरभरून आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर भारतातील काही स्टँड-अप कॉमेडियन्सनी आपल्या काॅमेडी शोमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या आणि पाकिस्तान विरोधातल्या भारताच्या कामगिरी बद्दल अभिमान व्यक्त केला आहे आणि पाकिस्तानचा चांगला खरपूस समाचार घेतला आहे.
१. स्टँडअप कॉमेडियन हर्ष गुजराल याने १८ मे रोजी त्याच्या शो मध्ये पाकिस्तानने राफेल बाबतीत केलेल्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. हर्ष गुजराल शो दरम्यान म्हणाला आहे की, “भारत हा सर्वोत्तम देश आहे, यापेक्षा दुसरा चांगला देश नाही. मात्र पाकिस्तानी म्हणत आहेत की, भारताचे राफेल आम्ही पाडले मग याबाबत मी त्यांना सांगू इच्छितो की, आम्ही दुसरे खरेदी करू. आम्हाला तुमच्यासारखे आयएमएफकडून कर्ज घेण्याची गरज नाही .. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या विराट कोहलीची विकेट तुम्हाला गेल्या १५ वर्षांत पाडता आली नाही ? पाकड्यांनो, जरी तुम्ही मी ‘जय हिंद’ म्हटल्यामुळे मला अनफॉलो केले तर मला काहीच फरक पडणार नाही.”
हर्ष गुजरालने पाकिस्तानला आपल्या शो मधून पाकिस्तानला चांगलीच चपराक लगावली आहे. तसेच सवंग प्रसिद्धीचा मोह टाळत अनेक पाकिस्तानी फाॅलोवर्स असतानाही त्याने आपल्या फाॅलोवर्सची चिंता न करता देशाबद्दलचा अभिमान प्रकट केला आहे.
२. प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन इंदर साहनीने २० मे रोजी त्याच्या शो मध्ये पाकिस्तानी लोकांच्या बुद्धिमत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांची कीव करावी तेवढी थोडी आहे. असे भाष्य केले आहे.
इंदर साहनी शोमध्ये म्हणाला आहे की, “एकीकडे भारत युद्धात चांगली कामगिरी करत विजयाकडे वाटचाल करत होता तर पाकिस्तानी लोक मीम्स टाकत त्यालाच आपला विजय समजत होते.
ऑपरेशन सिंदूरनंतर मी इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती की, “आम्हाला आमच्या संरक्षण दलांचा अभिमान आहे”. मात्र त्या पोस्टच्या कमेंटमध्ये पाकिस्तानच्या लोकांनी मला शिवीगाळ द्यायला सुरवात केली. पण मी त्यांच्या तोंडाला कशाला लागू इच्छित नाही. कारण त्यांची विचार करण्याची कुवत तेवढीच आहे.
आणि खरी परिस्थिती अशी आहे की, जितका भात पाकिस्तानमध्ये शिजवला जातो तेवढा तांदूळ तर आपल्याकडे नवरी सासरी जाताना सहज हवेत उडवते.”
३. स्टँडअप कॉमेडियन तरुण कृष्णाने ८ मे रोजी आपल्या द साबुन शो मध्ये पाकिस्तानचा युद्ध होण्याआधीचा अविर्भाव कसा होता आणि प्रत्यक्षात मात्र त्यांची कशी दाणादाण उडाली यावर भाष्य केले आहे.तसेच ऑपरेशन सिंदूर नंतर चीनच्या राष्ट्राध्यक्षांनीदेखील पाकिस्तानला सांगितले की, ज्या दिवशी जग पाकिस्तानचा पाठिंबा काढून घेईल त्या दिवशी चीनही घेईल हेही सांगत त्यांनी पाकिस्तान चीन संबंधांची खिल्ली उडवली आहे.
४. स्टँडअप कॉमेडियन साजिद अनवरने १० मे रोजी आपल्या शो मध्ये पाकिस्तानला युद्ध झेपणार नाही याबाबत आपल्या काॅमेडीत उल्लेख केला होता. साजिद अनवर म्हणाला आहे की, आता पाकिस्तानातल्या जनतेची झोप भारताने उडवून टाकली आहे.कारण याआधी पुलवामानंतर बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक होताना त्यांनी बघितला होता आता पहलगाम नंतर भारत अजून कश्या कश्या प्रकारे प्रतिक्रिया देईल याची भीती त्यांना लागली आहे. त्यामुळे ते पाकिस्तानातले लोकल चॅनल बघायचे सोडून भारताचे न्यूज चॅनेलवर लक्ष ठेऊन आहेत.
खरेतर अशाप्रकारे कठिण प्रसंगात प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाच्या यांच्या माध्यमातून देशाच्या कणखरतेचे कौतुक करणे आणि असाच अभिमान व्यक्त होणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांच्या मनात देशाप्रती अभिमान निर्माण होईल.आणि देशातील एकता टिकून राहील.