Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home गुन्हेविश्व

कट्टरपंथीयांना हिंदू प्रतीकांचा एवढा राग का?

News Desk by News Desk
May 25, 2025, 05:07 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

मागील काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किरकोळ कारणावरून धार्मिक तणावाची प्रकरणे सातत्याने समोर येताना दिसत आहेत. विशेषतः मुस्लिम बहुल भागात काही हिंदू व्यक्तींवर झालेल्या हल्ल्यांची प्रकरणे चर्चेचा विषय ठरली आहेत. अनेकदा ही प्रकरणे कायद्याच्या चौकटीत हाताळली गेली असून, पोलिस आणि प्रशासनाकडून कारवाईही झाली आहे. मात्र, अशा घटनांमुळे स्थानिक पातळीवर भीतीचे वातावरण निर्माण होते तसेच यामुळे सामाजिक सलोख्यावर देखील परिणाम होतो. त्याच पार्श्वभूमीवर या लेखात महाराष्ट्रात घडलेल्या काही ठराविक घटनांचा आढावा घेतला आहे? तसेच या घटना का घडतात? यामुळे समाजावर काय परिणाम होतात आणि २०२४ -२५ मध्ये अशा किती घटना घडल्या आहेत. ते सविस्तर जाणून घेऊयात.

जय भोले’ म्हटल्यामुळे हिंदू युवकावर हल्ला

२०२४ मध्ये जळगाव येथे एका हिंदू युवकाला इस्लामिक कट्टरपंथींनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला होता.८ ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये जय सोनावणे नावाच्या हिंदू युवकावर काही इस्लामिक कट्टरपंथींनी जीवघेणा हल्ला केल्याचा दावा करण्यात आला होता. हल्ल्याचे कारण ऐकून कुणालाही धक्का बसेल कारण फक्त एवढंच की जयने आपल्या मित्राशी बोलताना “जय भोले” असे म्हटले होते. खर म्हणजे ही घटना जळगावच्या तांबापूरा भागात घडली होती. जय आणि त्याचा एक मित्र तहान लागल्यामुळे पाणी घेण्यासाठी थांबले होते. त्याच वेळी जयला त्याच्या मित्राचा फोन आला आणि संभाषणादरम्यान त्याने “जय भोले” असे सहज म्हटले. पण त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या काही इस्लामिक कट्टरपंथींनी हे ऐकून आक्षेप घेतला आणि त्याला विचारले, “तु जय भोले का म्हणलास?” त्यावरून वाद विकोपाला गेला आणि सुरुवातीला चार जणांनी जयवर हल्ला केला. पाहता पाहता हल्लेखोरांची संख्या वाढून चाळीसपर्यंत गेली. या हल्ल्यात जयच्या डोळ्याजवळ गंभीर जखम झाली. नंतर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जय न्यायाची मागणी करत असल्याचं दिसून आले.

भगवा ध्वज फडकावला म्हणून रिक्षाचालकावर हल्ला.

मार्च 2025 मध्ये मुंबईतील मालाड (पश्चिम) भागात गुढी पाडवा निमित्ताने पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत सहभागी असलेल्या दोन तरुणांनी आपल्या रिक्षावर भगव्या ध्वजासह पारंपरिक गुढी लावली होती. तसेच भगवा ध्वज फडकावला होता.मात्र मिरवणूक मशिदीच्या जवळून जात असताना काही स्थानिक नागरिकांनी या ध्वजावर आक्षेप घेतला. यामुळे वाद उद्भवला आणि काही लोकांनी त्यांना मारहाण केली. नंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पण भगवा ध्वज फडकवण्यावरील हल्ला हे दर्शवितो की समाजात धार्मिक असहिष्णुता वाढत आहे. या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, शिवसेना नेते संजय निरुपम यांनी “दंगल” घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या “जिहादींची” घरे बुलडोझरने पाडण्याची मागणी केली होती.

केवळ हिंदू असल्याने केले टार्गेट

मुंबई-इंदूर अवंतिका एक्सप्रेसच्या जनरल डब्यात पालघरजवळ प्रवास करत असलेल्या वकील शीतल शरद भोसले यांच्यावर धार्मिक चिन्हांवरून वाद झाल्यानंतर हल्ला झाला. भोसले यांच्या हातात रुद्राक्ष माळा आणि डाव्या हातावर “शिवछत्रपती” गोंदलेले नाव पाहून एका बुरखा घातलेल्या महिलेलेने आक्षेप घेतला भोसले यांच्या म्हणण्यानुसार, ती बुरखा घातलेली महिला म्हणाली “रुद्राक्ष घालणे मूर्खपणाचे आहे.” यावर भोसले यांनी प्रत्युत्तर दिले, “मी तुझ्या बुरख्याबद्दल काही बोलत नाही, मग माझ्या माळेबद्दल तुला का त्रास होतो?” सर्व बोगीत मी एकमेव हिंदू महिला असल्याने टार्गेट करून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप शीतल  केला होता.

मीरा रोडवर हिंदू मिरवणुकीवर हल्ला

गेल्या वर्षी अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठाच्या उत्सवादरम्यान, मुंबईतील मीरा रोड येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यादरम्यान हिंदू समुदायाच्या लोकांनी त्यांच्या वाहनांवर भगवान राम आणि हनुमानाचे झेंडे लावत आणि “जय श्री राम” चा जयघोष करत चालले होते‌. मात्र या मिरवणुकीवर अचानक ५०-६० लोकांच्या कट्टरतावादी जमावाने काठ्या आणि रॉडने हल्ला केला. त्यांनी वाहनांचे तर नुकसान केलेच पण भगव्या ध्वजांची देखील विटंबना केली. या शिवाय जमावाकडून “अल्लाह-हू-अकबर” सारख्या धार्मिक घोषणा देण्यात आल्या हे घृणास्पद कृत्य करताना, जमााने महिलांनाही लोखंडी रॉड आणि काठ्यांनी मारहाण केली.

Yesterday night some jihadists attacked Hindus in Naya Nagar, Mira Road, Mumbai. Today on 22 January all Hindus took out a huge rally at the same place. #miraroad #thane #Mumbai pic.twitter.com/uuHjYleDBC

— Akash✨ (@Akaassshh) January 22, 2024

या घटनांमागची कारणे समजून घेताना असे दिसून येते की, अनेक वेळा काही कट्टरपंथीय लोक मुद्दाम अशा घटना घडवतात. त्यांचा उद्देश समाजात तणाव आणि भीतीचे वातावरण निर्माण करणे हा असतो. यात राजकीय पक्षांची भूमिका देखील नाकारता येत नाही. काही पक्ष धर्माच्या आधारावर आपली मते तयार करू पाहतात. त्यासाठी ते लोकांच्या भावना चिथवतात त्यामुळे अनकेदा तणावाची परिस्थिती निर्माण होते. तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे माहितीचा अभाव आणि अफवा. एखाद्या साध्या गोष्टीवरून पूर्ण माहिती न घेता चुकीची माहिती जाणीवपूर्वक पसरवली जाते. या सगळ्याचा परिणाम समाजाच्या मानसिक आरोग्यावर होतो. लोक सतत भीती, राग, आणि असुरक्षिततेच्या भावनेत जगू लागतात. तसेच अशा घटनांमुळे सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे नुकसान होते. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरचा ताण वाढतो ज्यामुळे पोलिसांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागतो.

2024-25 मध्ये घडलेल्या घटनांची आकडेवारी 

2024 मध्ये महाराष्ट्रात 4,836 हिंदू-मुस्लिम संबंधित सामुदायिक गुन्हे घडले, ज्यात 170 गंभीर आणि 3,106 सामान्य गुन्हे होते. तर 2025 च्या पहिल्या तीन महिन्यांत राज्यात 823 सामुदायिक तणावाच्या घटना घडल्या, ज्यात 156 गुन्हे जानेवारीत, 99 फेब्रुवारीत आणि 78 मार्चच्या मध्यापर्यंत नोंदवले गेले. या आकडेवारीत काही घटनांचा समावेश नसू शकतो, कारण सर्व घटना नोंदविल्या जात नाहीत. मात्र ही संख्या स्पष्टपणे वाढत्या ताणतणावाची आणि वाढत्या हल्ल्यांची साक्ष देतात.

Tags: Communal ViolenceMinority ExtremismReligious IntoleranceTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE
राज्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.