Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

News Desk by News Desk
May 29, 2025, 06:07 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

पारंपरिक मत्स्यव्यवसाय हे भारतातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर असलेल्या स्थानिक समुदायांचे जीवनमान आणि सांस्कृतिक ओळख यांचे प्रतीक आहेत. मात्र, बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांच्या अनधिकृत स्थलांतरामुळे या व्यवसायाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. २०२३-२४ मध्ये, पश्चिम बंगालच्या कूचबिहार, मुरसिदाबाद आणि कोलकाता परिसरात सीमेपलीकडून २५०० हून अधिक बांगलादेशी नागरिकांना अनधिकृत प्रवेश करताना अडवले गेले, यातील अनेकांनी मत्स्यव्यवसायात उतरले होते. आता मुंबईत देखील असाच प्रकार समोर आला आहे. या घुसखोरांकडून स्थानिक व्यापाऱ्यांना त्रास दिला जातो असे आरोप करण्यात येत आहेत. मात्र यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी दिला आहे.

1.नेमके प्रकरण काय?

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर पारंपारिक मत्स्यविक्रेत्यांना बाहेरून आलेल्या मच्छी विक्रेत्यांकडून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी मंत्री नितेश राणे यांच्याकडे आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणाची पाहणी केली. तेंव्हा त्यांना स्थानिक मासळी विक्रेत्यांकडून समजले की येथे काही बांगलादेशी रोहिंग्यांचे बेकायदेशीर वास्तव्य आहे. आणि ते स्थानिकांना मासोळी विक्री करु देत नाहीत. तसेच महिलांवर देखील हात उचलतात असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मंंत्री नितेश राणे त्यांनी स्थानिक अधिकारी आणि पोलिसांना कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. आणि जर पुन्हा इथं कोणी रोहिंग्या दिसला तर संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

2.अनधिकृत स्थलांतर करुन व्यवसाय सुरू करणाऱ्यांची उदाहरणे

बांगलादेशकडून हजारो लोक दरवर्षी भारतात घुसखोरी करत आहेत. त्याचप्रमाणे म्यानमारकडूनही मोठ्या संख्येने घुसखोरी होत आहे. हे घुसखोर मुंबईसारख्या शहरात येतात आणि इथच छोटा मोठा व्यवसाय करुन ठाण मांडून बसतात.

आसाम
२०२४ साली आसाममध्ये देखील स्थलांतरित मुस्लिम आणि स्थानिक समुदायांमध्ये माशांवरुन संघर्ष पेटला होता. ज्यामध्ये उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या स्थानिकांना माशांचा होणारा पुरवठा थांबवण्यात आला होता.

पश्चिम बंगाल
पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात भारतीय तटरक्षक दलाने ८८ बांगलादेशी मच्छीमारांना भारतीय जलसीमेत अनधिकृतपणे मासेमारी करताना अटक केली होती. त्यांच्याकडून ३६० किलो मासे आणि तीन बोटे जप्त करण्यात आली होती.

दादर (मुंबई)
येथे फक्त मत्स्य व्यवसाय नव्हे, तर दूध, फळे, भाज्या, मांस, कपडे, नारळ पाणी, फुटपाथ विक्री, भंगार, न्हावी, फर्निचर अशा अनेक व्यवसायांमध्ये मुस्लिम विक्रेत्यांचे प्रमाण वाढले आहे. दादर मार्केटमध्येही अनेक दुकाने मुस्लिमांकडे गेली असून, हे प्रमाण वाढत राहिल्यास भविष्यात संपूर्ण मार्केट त्यांच्या ताब्यात जाण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

3.पारंपरिक व्यवसायांचे अस्तित्व धोक्यात

भाऊच्या धक्क्यासारख्या महत्त्वाच्या बंदरावर बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांनी बेकायदेशीरपणे व्यवसायात शिरकाव करण्याचा प्रयत्न केल्यामुळे स्थानिक कोळी बांधवांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. शिवाय या घुसखोरांमुळे देशातील इतर पारंपरिक मत्स्यव्यवसायाच्या अस्तित्वालाही मोठा धोका निर्माण होत असून त्यांच्या उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. खरं म्हणजे आसाम, पश्चिम बंगाल आणि मुंबईतील दादर सारख्या भागात घुसखोरांची संख्या चिंताजनक आहे. ‌जर यावर वेळेत नियंत्रण मिळाले नाही तर हा व्यवसाय पूर्णपणे संपुष्टात येण्याची भीती आहे, व्यक्त होत आहे.

4.फेक डॉक्युमेंट्सचे रॅकेट

मुंबईतील भाऊचा धक्का या ठिकाणाची पाहणी केल्यानंतर मंत्री राणे यांनी याबाबत गंभीर आरोप करत सांगितलं की, “या घुसखोरांचा प्रवेश बनावट कागदपत्रांच्या आधारे होतो आहे. पश्चिम बंगालमधून तयार केलेले फेक डॉक्युमेंट्स वापरून हे लोक महाराष्ट्रात प्रवेश करत आहेत.” हे केवळ एक अपवादात्मक प्रकरण नाही तर एप्रिल २०२५ मध्येही दिल्ली पोलिसांनी १२१ बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. या नागरिकांकडे बनावट आधार कार्ड आणि रेशन कार्ड होते. स्थानिक लोकांनी त्यांना निवास दिला होता. तसेच त्यांनी ही कागदपत्रे अधिकाऱ्यांच्या मदतीने मिळवली होती असा आरोप आहे. याशिवाय जानेवारी २०२५ मध्ये, कोलकातामध्ये एक मोठे बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस आले होते. या रॅकेटमध्ये बांगलादेशी नागरिकांना आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड आणि जन्म प्रमाणपत्रे बनवून देण्यात आली होती. या कागदपत्रांसाठी प्रत्येकी ३,००० ते १५,००० रुपये आकारले जात होते. या सर्व उदाहरणांवरून दिसून येते की सध्या भारतातील विविध भागात एक मोठे गुन्हेगारी रॅकेट वाढत आहे आणि त्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

लोकसंख्येचा बदल – एक गंभीर इशारा

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) च्या अहवालानुसार, मुंबईतील हिंदू लोकसंख्या 1961 मध्ये 88% होती, पण 2011 मध्ये ती 66% वर आली. जर हे प्रमाण असंच राहिले, तर 2051 पर्यंत हिंदू लोकसंख्या 54% पेक्षा कमी होऊ शकते, तर मुस्लिम लोकसंख्या सुमारे 30% पर्यंत वाढू शकते.

एकुणच मुंबईसारख्या शहरांमध्ये घुसखोरांच्या वाढत्या उपस्थितीमुळे पारंपरिक व्यवसायांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. केवळ मासळीच नव्हे, तर इतर लघुउद्योगांवरही त्यांचा परिणाम जाणवू लागला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढत असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि केंद्र सरकार यांनी वेळेवर पावले उचलली नाही, तर केवळ व्यवसायच नव्हे, तर सांस्कृतिक ओळख, लोकसंख्येचा समतोल आणि सामाजिक शांतीही धोक्यात येऊ शकते.

Tags: mumbairohingeTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update
राष्ट्रीय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.