Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home general

शिव होऊन शिवोपासना करा !

param by param
Mar 8, 2024, 10:04 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

भगवान शंकर ज्ञानाची देवता आहे. त्यांच्या मस्तकातून वाहणारी गंगा ही ज्ञानगंगा म्हणून ओळखली जाते. शिव हे ज्ञानाचे राजे आहेत. शंकराचा भक्त हा ज्ञानाचा उपासक असला पाहिजे. त्याची ज्ञान तृष्णा पराकोटीची असली पाहिजे तरच तो शिवभक्त होय. शिवाची उपासना करणाऱ्या ज्ञानी माणसाची बुद्धी अत्यंत शुद्ध आणि पवित्र असते. जीवनाच्या कठीण समस्येतून आपण यशस्वी होऊ शकतो हा विश्वास ही हिंमत शिवभक्तात असते.

भगवान शंकर यांचे वास्तव्य कैलास पर्वतात आहे. याचा अर्थ ज्ञानाची बैठक शुद्ध आणि धवल असली पाहिजे. चारित्र्याची बैठक शुद्ध असेल तरच ज्ञान शोभून दिसते. असा संदेश आपल्याला भगवान शंकर देतात.

कैलास पर्वत म्हणजे ज्ञानाचे उत्तुंग शिखर आहे. या उत्तुंग शिखरावर बसून भगवान शंकर समस्त मानवी समाजाचे कल्याण करण्यासाठी तत्पर आहेत. मानवी समाजाच्या कल्याणासाठी ज्यांनी हलाहल विष प्राशन केले असा एकमेव देव म्हणजे महादेव! म्हणूनच भगवान शंकर यांना महादेव ही उपाधी शोभून दिसते. भगवान शंकर आपल्याला सांगतात कल्याणाचा मार्ग हा साधा सरळ नाही तर तो काट्यांनी भरलेला आहे. खडतर साधना केल्याशिवाय शिवतत्त्व प्राप्त होत नाही. हेच महादेव आपल्याला भक्तांना समजावत आहेत.

भगवान शंकर ही ज्ञानाची देवता आहे. भगवान विष्णू ही भक्तीची देवता आहे. भगवान विष्णू शंकराची पूजा करत असताना सहस्रकमळे अर्पण करत होते. त्यावेळी एक कमळ कमी पडले म्हणून त्यांनी स्व-नेत्र शिवाला अर्पण केले. याचा अर्थ ज्ञानाला भक्तीचा नेत्र असला पाहिजे. म्हणजेच ज्ञानदृष्टीला भक्तीची दृष्टी प्राप्त झाली तर जीवनाला परिपूर्णता येते. भक्ती वाचून असलेले ज्ञान बलहीन आहे तर ज्ञानावाचून असलेली भक्ती दृष्टीहीन आहे. ज्ञान विश्लेषण करते तर भक्ती समन्वय साधते. म्हणजेच ज्ञान विश्लेषण करून तत्त्वाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करते. भक्ती समन्वय साधून सौंदर्य शोधून काढते. याचाच अर्थ शिवभक्ताला ज्ञान आणि भक्तीचा नेत्र असला पाहिजे, दृष्टी असली पाहिजे तर तत्त्वज्ञानात रममाण होऊन सुद्धा सौंदर्याचा उपभोग घेता येतो.

भगवान शंकरांनी सर्वांगाला विभूती का फासली आहे?

शंकर ही ज्ञानाची देवता आहे. हे ज्ञान विशुद्ध आणि धवल आहे. विशुद्ध आणि धवल ज्ञान विभूतीलाच वैभव मानते. असा संदेश देण्यासाठी भगवान शंकरांनी अंगाला भस्म लावले आहे.

भगवान शंकरांच्या हातात असलेला त्रिशूल सज्जनांना संरक्षणाचे आश्वासन देतो तर दुष्ट दुर्जनांना धाक दाखवतो. भगवान शंकर यांना भोलानाथ असे म्हणतात. काहीजण भोलानाथ याचा अर्थ भगवान शंकर भोळे आहेत आशा लावतात. वास्तविक भोलानाथ याचा अर्थ साध्या भोळ्या लोकांचा नाथ असा आहे. साध्या भोळ्या लोकांचे दुष्टांपासूनू संरक्षण करणारी देवता म्हणजे भगवान शंकर आहेत. म्हणूनच त्यांना भोलानाथ म्हटले जाते.

भगवान शंकरांच्या हातातला डमरू हे संगीताचे प्रतीक आहे. सृष्टीमधील विविध प्रकारच्या रहस्यांची उकल भगवान शंकर डमरू वाजवून करत असतात. आद्य व्याकरणकार पाणिनी यांना व्याकरणाचा बीजमंत्र भगवान शंकरांनी डमरू वाजूनच दिला.

भगवान शंकर यांनी हलाहल प्राशन केले. ते विष प्राशन केल्यावर त्यांनी ते कंठातच धारण केले. याचा अर्थ संपूर्ण सृष्टीला आणि समाजाला हानिकारक असणारे विचार मस्तकात जाऊ द्यायचे नाहीत. तसेच ते अंतःकरणातही जाऊ द्यायचे नाहीत. दुष्ट अपरिपक्व विचारांमुळे बुद्धी आणि अंत:करण मलीन होऊ द्यायचे नाही हा संदेश नीलकंठ या शब्दातून आपल्याला सांगितला जात आहे.

मस्तकातून ज्ञानाची गंगा वाहिली पाहिजे. शिवभक्ताचे चारित्र्य कैलासासारख्या धवल शिखरासारखे उत्तुंग आणि विशुद्ध असले पाहिजे. शिवभक्ताने साधेपणाचा शृंगार करून विभूतीला वैभव मानले पाहिजे. सज्जनांचे रक्षण आणि दृष्टांचा संहार हेच शिवभक्ताचे जीवनव्रत असले पाहिजे. मानवी समाजाच्या आणि जीवसृष्टीच्या कल्याणार्थ प्रसन्नतेने विषप्राशन करण्याचे सामर्थ्य शिवभक्तात असणे आवश्यक आहे. कारण शिवाची उपासना करणारा भक्त हा शंकरासारखाच असला पाहिजे. कारण शिवाची उपासना आपण स्वतः शिव होण्यासाठीच करायची असते. तरच ती फलद्रूप होते. अन्यथा शिव उपासनेला अर्थ राहत नाही.

– दुर्गेश जयवंत परूळकर

९८३४१०६८१२

Tags: mahashivratrishivabhkatashivupasana
ShareTweetSendShare

Related News

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!
general

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन
general

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे
general

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त
general

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.