Shrikant Shinde: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर'(Operation Sindoor) राबवत दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले यात शंभरहून अधिक दहशतवादी मारले गेले. त्यामुळे दहशतवादी नेटवर्कला मोठा धक्का बसला. याच पार्श्वभूमीवर ’ऑपरेशन सिंदूर’ विषयी देशाची भूमिका जागतिक मंचावर सक्षमपणे मांडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय 7 शिष्टमंडळांची स्थापना केली आहे. शिष्टमंडळांचे नेतृत्व कोणी करायचे आणि प्रत्येक शिष्टमंडळाने कोणकोणत्या देशांचे दौरे करायचे हे सरकारने निश्चित केले आहे. या शिष्टमंडळांमध्ये एकूण 51 सदस्य आहेत. त्यापैकी 31 प्रतिनिधी हे सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील आहेत. तर उर्वरित 20 सदस्य हे विरोधी पक्षांमधील आहेत. त्यातील २ शिष्टमंडळ आता परदेशात रवानाही झाले आहेत. मग विदेशी दौऱ्यावर असणाऱ्या या दोन शिष्टमंडळांनी आतापर्यंत काय साध्य केले याची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखातून घेऊयात.
श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ:
-शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात सुषमा स्वराज यांची कन्या भाजपा खासदार बन्सुरी स्वराज, मनन कुमार मिश्रा, एस. एस. अहलुवालिया, जनता दलाचे खासदार सस्मित पात्रा, इंडियन युनियन मुस्लीम लीगचे खासदार ई टी महंमद बशीर आणि भारतीय राजदूत सुजान चिनॉय यांचा समावेश आहे.
विदेशी दौऱ्यावर दाखल होण्यापूर्वी श्रीकांत शिंदेंनी दिलेली प्रतिक्रिया:
-“भारत हा शांतताप्रिय देश आहे. मात्र कोणी भारतावर हल्ला केला तर भारत जशास तसे उत्तर देईल. भारताचा मुख्य भर आर्थिक विकासावरच राहिला आहे. याउलट पाकिस्तान नेहमीच दहशतवादाला खतपाणी घालत आला आहे, असा स्पष्ट संदेश आम्ही विदेशी दौऱ्यादरम्यान देणार आहोत.” अशी प्रतिक्रिया त्यांनी विदेशी दौऱ्यावर जाण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना दिली.
श्रीकांत शिदेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचा युनायटेड अरब अमिरातीचा दौरा:
– खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ २२ मे रोजी विदेशी दौऱ्यावर दाखल झाले आहे.
– सर्वप्रथम हे शिष्टमंडळ युनायटेड अरब अमिरातीला पोहचले.
– या शिष्टमंडळाने २२ मे रोजी अबू धाबी येथील राष्ट्रीय माध्यम कार्यालयाचे महासंचालक डॉ. जमाल मोहम्मद ओबैद अल काबी यांची देखील भेट घेतली आणि त्यांना भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती दिली. त्यावेळी डॉ. जमाल मोहम्मद ओबैद अल काबी यांनी दहशतवादी संघटना आणि दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशासोबत युनायटेड अरब अमिराती कधीही उभे राहणार नाही, असे आश्वासन भारताला दिले. युएई दहशतवादाच्या विरोधात आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
– तसेच युनायटेड अरब अमिरातीचे संरक्षण समितीचे अध्यक्ष अली रशीद अल नुआमी आणि सहिष्णुता मंत्री नाहयान यांच्याशीही शिष्टमंडळाशी बैठक झाली या बैठकीत ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती त्यांना देण्यात आली.
– युएईच्या नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी एएनआयशी बोलताना प्रतिक्रिया दिली की, “दहशतवादाविरुद्ध पूर्ण वचनबद्धतेने युएई भारतासोबत खांद्याला खांदा लावून उभा आहे असे वाटत आहे”
– एकंदरित युएईने भारताच्या दहशतवादा विरोधातल्या लढ्याला समर्थन दिल्याचे स्पष्ट होते.
-श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आता कांगो, सिएरा लिओन लायबेरीया या देशांना भेट देत ऑपरेशन सिंदूरची माहिती देणार आहे.
संजय झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ:
-संजय झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात भाजप खासदार अपराजिता सारंगी आणि ब्रिज लाल, तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी, राज्यसभा सदस्य जॉन ब्रिटास आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांचा समावेश होता.
संजय झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचा जपान दौरा:
-संजय झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचा पहिला दौरा जपानमध्ये होता.
– संजय झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची 22 मे रोजी जपानच्या टोकियो शहरात जपानच्या नेत्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत शिष्टमंडळाने भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती दिली.
– या बैठकीदरम्यान जपानचे परराष्ट्र मंत्री ताकेशी इवाया यांनी दहशतवादी कारवायांबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच त्यांनी नुकत्याच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचाही निषेध केला. बैठकीदरम्यान इवाया यांनी गुन्हेगारांना न्यायाच्या चौकटीत आणले पाहिजे यावर भर दिला. तसेच भारताच्या दहशतवाद विरोधी कारवाईलाही त्यांनी जाहीरपणे पाठिंबा दर्शविला.
– या बैठकीनंतप संजय झा यांनी ट्विट करत जपानचे आभार मानले.
– विशेष म्हणजे या शिष्टमंडळाने जपानच्या प्रमुख माध्यमांशीही संवाद साधला. त्यावेळी या शिष्टमंडळाने भारताच्या शून्य-सहिष्णुता धोरणाची माहिती दिली. तसेच लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांसरख्या दहशतवादी गटांना पाकिस्तानकडून मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल सविस्तर माहिती सादर केली.
दुनिया में जब भी कोई आतंकी घटना होती है, उसके तार किसी न किसी रूप में पाकिस्तान से जुड़ते हैं। आतंकवाद और उसे शरण देने वाली सरकार को अब अलग करके नहीं देखा जा सकता।
'ऑपरेशन सिंदूर' के जरिये भारत का संदेश स्पष्ट है- 'अब बहुत हो गया'। अगर भारत में आतंकी हमला होगा, तो उसे देश के… pic.twitter.com/TlXRsX91Tp
— Sanjay Kumar Jha (@SanjayJhaBihar) May 23, 2025
All-Party Delegation from India interacted with the Japan-India Parliamentary Friendship League led by Chairman H.E. Mr. Yasutoshi Nishimura. India’s resolute stance of zero tolerance towards terrorism was conveyed. Members of the league expressed support for India’s resolve to… pic.twitter.com/kRmgSI37BP
— India in Japanインド大使館 (@IndianEmbTokyo) May 23, 2025
– संजय झा यांनी जपानच्या माध्यमांशी संवाद साधल्यानंतर एक्सवरी पोस्ट करत म्हटले आहे की, “हा संवाद शांतता, सुरक्षा आणि सामायिक लोकशाही मूल्यांवर आधारित जागतिक भागीदारी मजबूत करतो,”.
-आता हे शिष्टमंडळ पुढे इंडोनेशिया, मलेशिया, दक्षिण कोरिया आणि सिंगापूरला भेट देणार आहे.
दरम्यान, दहशतवादाविरोधात जागतिक समर्थन मिळवण्याच्या दृष्टीने तसेच महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आणि द्विपक्षीय चर्चांमध्ये भारताचे स्थान मजबूत करण्यासाठी भारत सरकारचे एक महत्वपूर्ण पाऊल म्हणून याकडे पाहिले जात आहे.