Sunday, June 15, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home राज्य

घुसखोरी राज्यासमोरील एक मोठे आव्हान! – भाग 1

News Desk by News Desk
Jun 14, 2025, 02:24 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

Infiltration into the state of Maharashtra: देशात विविध ठिकाणांहून होणारी घुसखोरी ही देशासमोरील एक मोठे आव्हान ठरत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात होणारी घुसखोरी हा सुद्धा राज्य सरकार समोरील सर्वात चिंतेचा विषय ठरत आहे. राज्यात प्रामुख्याने मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरात घुसखोरांचा अक्षरशः सुळसुळाट पाहायला मिळत आहे. राज्यात तब्बल एक कोटीपेक्षा जास्त घुसखोर राहत असल्याचा अंदाज विविध संस्था करत आहेत. पंरतु राज्यातील घुसखोरीविषयी निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही. घुसखोरीमुळे राज्यात गुन्हेगारीच्या घटना घडल्या आहेत. घुसखोरी केलेल्या लोकांनी  खोटी कागदपत्रे मिळवून मतदान केल्याचे देखील आढळून आहे. एकंदरित राज्यात होणाऱ्या घुसखोरीमुळे  राज्याच्या सामाजिक, आर्थिक आणि सुरक्षा व्यवस्थेसाठीअनेक गंभीर परिणाम पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर आपण ‘राज्यात होणारी घुसखोरी’ या वरती एक सिरीज करत आहोत. त्यातील आजच्या पहिल्या भागात आपण घुसखोरी म्हणजे नेमके काय, राज्यात होणाऱ्या घुसखोरीचे स्वरूप आणि घुसखोरीमुळे राज्यावर होणाऱ्या परिणामांची ओळख करून घेणार आहोत.

महाराष्ट्रात होणारी घुसखोरी म्हणजे काय: (What is infiltration in Maharashtra?)

जेव्हा एखादी व्यक्ती किंवा मानवी समूह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर कामासाठी किंवा इतर काही कारणांसाठी जातात, तेव्हा आपण त्याला स्थलांतर असे म्हणत असतो. परंतु हेच स्थलांतर जर कायदेशीरपणे झाले तर ते खरे कायदेशीर स्थलांतर. परंतु हे स्थलांतर जर बेकायदेशीरपणे झाले तर त्यालाच घुसखोरी असे म्हटले जाते.

-आता महाराष्ट्र राज्यात होणारी घुसखोरी म्हणजे, महाराष्ट्र राज्यात विविध कारणांमुळे महाराष्ट्रा बाहेरील नागरिक बेकायदेशीरपणे किंवा अनधिकृतपणे महाराष्ट्रात प्रवेश मिळवून येथेच स्थायिक झाली आहेत. हे घुसखोर बनावट कागदपत्रांचा वापर करून, सुरक्षा यंत्रणांना चकवा देऊन, सीमा ओलांडून महाराष्ट्र राज्यात प्रवेश मिळवतात आणि इथे येऊन महाराष्ट्रातील सगळी खोटी कागदपत्रे मिळवून महाराष्ट्रीयन असल्याचा दावा करतात.

महाराष्ट्रातील घुसखोरीचे स्वरूप: (Nature of infiltration in Maharashtra)

महाराष्ट्र राज्य हे भारताच्या सर्वात प्रगत आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यांपैकी एक आहे. त्यामुळे रोजगाराचे प्राथमिक उदिष्ट समोर ठेवून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होते. त्यामध्ये भारताच्या इतर राज्यातूनही मोठ्या प्रमाणात घुसखोरी होते. तर देशात घुसलेले विदेशी नागरिकही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यात वास्तव्यास येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात होणाऱ्या घुसखोरी प्रामुख्याने दोन प्रकार पडले आहे ते म्हणजे ‘आंतरराज्यीय घुसखोरी’ आणि ‘इतर देशातून होणारी घुसखोरी’.

– आंतरराज्यीय घुसखोरी:

– महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, संभाजीनगर नागपूर यांसारख्या औद्योगिक आणि व्यावसायिक शहरांमध्ये रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. तसेच बांधकाम क्षेत्र, उत्पादन आणि सेवा क्षेत्र आणि असंघटित उद्योगांमध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यांमधून मोठ्या प्रमाणात शहारांमध्ये घुसखोरी होत आहे.

-एवढचे नाही तर आता हे परप्रांतीयांचे जाळे खेड्यापाड्यापर्यंत सुद्धा पोहचल्याचे पाहायला मिळत आहे.आता महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील उदाहरण द्यायचे झाल्यास पुरंदर तालुक्यातील जेजुरी, सासवड, निरा, माळशिरस, वाघापूर चौफुला, चांबळी, भिवरी, दिवे,गराडे, पांगारे, वीर, परिंते यांसारख्या खेड्यापाड्यात सुद्धा परप्रांतीयांची घुसखोरी वाढल्याचे नुकतेच समोर आले आहे. या खेड्यांमध्ये राहणारे घुसखोर सुतारकाम, गवंडीकाम फॅब्रिकेशनची कामे करत आहेत. तसेच इतर काही कामे मिळाली तर तेही करतात. घुसखोरी केलेली काही लोक जरी काम करून शांत राहत असले तरी यातील बरेच लोक संध्याकाळी दारू पिऊन आपआपसात भांडणे करतात त्यामुळे या गावातील वातावरण दूषित होते आणि गावातील शांततेचा भंग होतो. ज्या भागात हे घुसखोर राहत आहेत तिथे चोरीच्या घटना वाढल्याचे दिसत आहे. सासवडच्या बाजारात दागिने, पैसे चोरीच्या घटना वाढल्या आहेl. विशेष म्हणजे या भागात जनावर चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे या मजूर परप्रांतीयांनी आसपास राहणाऱ्या मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्याही घटनाही घडल्या आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांनी या घुसखोरांना घरे भाड्याने दिली आहेत. घुसखोरांनी घर मालकांना भाडे जास्त दिल्याचे आमिष दाखवल्याने भाडे जास्त मिळत असल्याने ही घरमालके परप्रांतीयांची ओखपत्राची पडताळणी न करताच त्यांना राहून देत आहेत.

-आज राज्यातील कोणत्याही औद्योगिक वसाहतीमध्ये गेले तर तेथील वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये स्थानिक कामगार आणि मजूरांपेक्षा परप्रातीयांची संख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे. हे परप्रांतीय लोक कमी पैशात काम करत असल्याने कारखानदारही या लोकांना प्राधान्य देत आहेत.

-एकंदरित, १960 च्या दशकात महाराष्ट्रात औद्योगिकरणाला वेग आल्याने अनेक राज्यातील लोकांनी महाराष्ट्रात स्थलांतर करायला सुरवात केली. यातूनच पुढे इतर राज्यातून महाराष्ट्रात होणारी घुसखोरीची समस्या पुढे आली.

बाहेरील देशातून महाराष्ट्रात होणारी घुसखोरी:

महाराष्ट्र राज्यात बाहेरील देशांमधून होणारी घुसखोरी ही अत्यंत गंभीर समस्या बनली आहे. महाराष्ट्रात बांगलादेश आणि म्यानमारमधून येणाऱ्या घुसखोरांची संख्या अधिक आहे. केंद्र सरकारने चार वर्षांपूर्वी देशात बांगलादेशमधून घुसखोरी केलेल्यांची संख्या पाच ते सहा कोटी असावी असा अंदाज व्यक्त केला होता. त्यातील ५० लाखांहून अधिक बांगलादेशी घुसखोर एकट्या महाराष्ट्रात आल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे बांगलादेशी घुसखोरीचा सर्वाधिक धोका महाराष्ट्रालाचा आहे असे म्हणावे लागेल.

महाराष्ट्र हे राज्य विकसनशील राज्य असल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध आहे. त्यामुळे रोजगाराच्या शोधात अनेक बांगलादेशी घुसखोर महाराष्ट्रात येत असल्याचे दिसून आले आहे. अनेक काराखान्यांमध्ये, हॉटेलवर वेटर, बांधकाम मजूर, फेरीवाले अशी काही कामे बांगलादेशी घुसखोर महाराष्ट्रात येऊन करतात. पुरूष लोक इथे येऊन स्थिर झाले की ते आपल्या कुटुंबालाही येथे आणतात आणि बनावट कागदपत्राच्या आधारे कुशाल महाराष्ट्रात राहतात. बांगलादेशी खुसखोर बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड तयार करतात आणि राज्यातील अनेक योजनांचा लाभही घेतात.

मागील काही वर्षात राज्यात पुणे आणि मुंबईत बांगलादेशींचा सर्वाधिक विळखा असल्याचे दिसून येत आहे. मात्र, आता बांगलादेशींनी पुण्या मुंबईतील खर्च पाहून राज्याच्या कानाकोपऱ्या प्रस्थान केल्याचे दिसत आहे. मार्च २०२५ मध्ये सांगलीमधून एका बांगलादेशी घुसखोराला अटक केल्यानंतर त्याने माहिती दिली की, पुणे आणि मुंबईतील खर्च परवडत नसल्याने आपण सांगलीत आलो आहोत. आज राज्यातील खेड्यापाड्यात घुसून बांगलादेशी घुसखोर काम करत आहेत.

अलकीडे आता आणखी एक प्रश्न समोर येत आहे तो म्हणजे राज्याच्या औद्योगिक वसाहतींध्ये अनेक परप्रांतीय काम करत आहेत असे आपण म्हणतो पण त्यातील सर्वच लोक परप्रांतीय आहेत की बांगलादेशी घुसखोर आहेत याची माहिती कोणाकडेच नाही. त्यामुळे परप्रातीयांच्या नावाखाली राज्याच्या कानाकोपऱ्यान बांगलादेशी घुसखोर असण्याची शंकाही उपस्थित होत आहे.

 घुसखोरीमुळे उद्भवलेल्या समस्यांची ओळख:

अशाप्रकारे महाराष्ट्रात होणाऱ्या परप्रांतीयांच्या घुसखोरीमुळे आणि इतर देशातून होणाऱ्या घुसखोरीमुळे राज्यात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांवरती आपण सिरीजमध्ये एक विशेष भाग लिहणार आहोत. परंतु आजच्या भागात आपण घुसखोरीमुळे राज्यासमोर निर्माण झालेल्या आव्हानांची माहिती घेणार आहोत.

-घुसखोरी करणारे बहुतांश लोक रोजगाराच्या शोधात आलेले असतात. त्यामुळे स्थानिक लोकांच्या रोजगारावर परिणाम होतो.

-घुसखोर नागरिकांनी बनावट कागदपत्रे बनविल्यामुळे राज्यातील लोकांच्या वाट्याच्या योजनांचा लाभ हे घुसखोर घेतात.

-घुसखोर करून आलेल्या नागरिकांमुळे राज्याच्या सुरक्षितता धोक्यात येते. कारण काही घुसखोर हे दहशतवादी संघटनेशी संबंधित असतात. तसेच बांगलादेशी घुसखोरांमुळे गुन्हेगारीच्या घटना घडल्याचे देखील समोर आले आहे.

-घुसखोरांमुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टीचे प्रमाण वाढले आहे.

-टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने म्हणजेच टीसने २०२४ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालात असा इशारा दिला आहे की, बांगलादेशी नागरिकांची आणि रोहिंग्यांची अशीच राज्यात घुसखोरी सुरू राहिली तर २०५१ मध्ये एकट्या मुंबई शहरात ५४ टक्क्यांनी हिंदूंची संख्या घटेल.

-महाराष्ट्रात बाहेरील राज्यातून येणाऱ्या नागरिकांमुळे मुंबईत मराठी भाषेचा प्रश्न सातत्याने समोर येत असल्याचे आपण पाहिले आहे.

दरम्यान, बांगलादेशी घुसखोरीसह आंतरराज्यीय घुसखोरी ही सुद्धा महाराष्ट्रासमोरील एक मोठे आव्हान ठरत आहे. आता सिरीजच्या दुसऱ्या भागात आपण महाराष्ट्रात घुसखोरी नेमकी कशी होते याची सविस्तर माहिती घेणार आहोत.

Tags: bangladeshi ghuskhorbangladeshi infiltrationInfiltration into the state of MaharashtraTOP NEWStypes of infiltration
ShareTweetSendShare

Related News

नक्षलवाद आणि दहशतवाद यामधील फरक भाग-2
राज्य

नक्षलवाद आणि दहशतवाद यामधील फरक भाग-2

महाराष्ट्रातील नक्षलवाद: उगम ते आत्मसमर्पणापर्यंतचा प्रवास
राज्य

महाराष्ट्रातील नक्षलवाद: उगम ते आत्मसमर्पणापर्यंतचा प्रवास

महाराष्ट्र ख्रिस्ती धर्मांतरणाच्या विळख्यात अडकलाय?
राज्य

महाराष्ट्र ख्रिस्ती धर्मांतरणाच्या विळख्यात अडकलाय?

RSS चे सहा शिल्पकार: सरसंघ चालकांचे व्यक्तिमत्व विचार व कार्य
राज्य

RSS चे सहा शिल्पकार: सरसंघ चालकांचे व्यक्तिमत्व विचार व कार्य

पंच परिवर्तन (भाग -१ )
राज्य

पंच परिवर्तन (भाग -१ )

Latest News

नक्षलवाद आणि दहशतवाद यामधील फरक भाग-2

नक्षलवाद आणि दहशतवाद यामधील फरक भाग-2

महाराष्ट्रातील नक्षलवाद: उगम ते आत्मसमर्पणापर्यंतचा प्रवास

महाराष्ट्रातील नक्षलवाद: उगम ते आत्मसमर्पणापर्यंतचा प्रवास

महाराष्ट्र ख्रिस्ती धर्मांतरणाच्या विळख्यात अडकलाय?

महाराष्ट्र ख्रिस्ती धर्मांतरणाच्या विळख्यात अडकलाय?

घुसखोरी राज्यासमोरील एक मोठे आव्हान! – भाग 1

घुसखोरी राज्यासमोरील एक मोठे आव्हान! – भाग 1

बिकट काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच देशासोबत ठामपणे उभा!

बिकट काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच देशासोबत ठामपणे उभा!

RSS चे सहा शिल्पकार: सरसंघ चालकांचे व्यक्तिमत्व विचार व कार्य

RSS चे सहा शिल्पकार: सरसंघ चालकांचे व्यक्तिमत्व विचार व कार्य

पंच परिवर्तन (भाग -१ )

पंच परिवर्तन (भाग -१ )

मोदी सरकारचे ऊर्जा बचतीसाठी मोठे पाऊल ,एसीच्या वापराबाबत नवीन नियमावली येणार

मोदी सरकारचे ऊर्जा बचतीसाठी मोठे पाऊल ,एसीच्या वापराबाबत नवीन नियमावली येणार

राज्य सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा!

राज्य सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा!

संरक्षण क्षेत्रात क्रांती घडवणारी क्षेपणास्त्रे

संरक्षण क्षेत्रात क्रांती घडवणारी क्षेपणास्त्रे

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.