काही महिन्यांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit shah) यांनी २०२६ पर्यंत नक्षलवादाला पूर्णविराम देण्याचा संकल्प जाहीर केला होता. त्याच पार्श्वभूमीवर देशाच्या सुरक्षा यंत्रणांनीही आता या लढ्याची मानसिक तयारी पूर्ण केली आहे. नक्षलवाद हा केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा नसून, विकासाच्या विरोधात उभा असलेला अडथळा आहे. त्यामुळे सध्या एकीकडे नक्षलवादाच्या विरुद्ध ठोस कारवाया आणि विविध ऑपरेशन्स सुरू आहेत, तर दुसरीकडे या भागात वेगाने विकास घडवून आणण्याचा प्रयत्नही होत आहे. वस्तुतः भाजप सरकार सत्तेत आल्यापासून देशात आणि राज्यात नवनवीन बदल घडताना दिसत आहेत. कधी काळी नक्षलवादाने भारतातील अनेक भाग झाकून टाकले होते. पण आज त्याच ठिकाणी काही नक्षलवादी आत्मचिंतन करताना दिसत आहेत, मार्ग बदलत आहेत. ही बदलाची सुरुवातच म्हणावी लागेल. अमित शाह यांचा संकल्प म्हणजे या लढाईतील निर्णायक टप्प्याकडे टाकलेले विश्वासाचे आणि कृतीचे पाऊल आहे, असे म्हणता येईल पण या नक्षलवादाची सुरुवात नेमकी कशी आणि का झाली होती? त्याच्या सुरुवातीपासून ते आत्मसमर्पणापर्यंतचा हाच प्रवास आपण या सिरिजच्या माध्यमातून सविस्तर समजून घेणार आहेत.
1.नक्षलवादाची व्याख्या आणि प्रकार (Definition and Type)
नक्षलवाद म्हणजे काय? (What is Naxalism)
नक्षलवाद हा भारतामधील एक सशस्त्र कम्युनिस्ट चळवळ आहे, जो मुख्यतः माओवादी विचारसरणीवर आधारित आहे. याचा उगम पश्चिम बंगालमधील नक्षलबारी गावात १९६७ साली झाला, म्हणून या चळवळीला “नक्षलवाद” असे नाव देण्यात आले. या चळवळीचा उद्देश गरीब शेतकरी, आदिवासी आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी लढा देणे असा होता, पण नंतर ही चळवळ हिंसात्मक मार्गाने सरकारविरोधी संघर्षात बदलली. वस्तुतः सशस्त्र क्रांतीद्वारे सत्तांतर करणे हेच त्यांच्या विचारांचे केंद्रस्थान असते. त्यांना “माओवादी” असेही संबोधले जाते, कारण त्यांची विचारधारा चीनच्या माओवादी तत्वांवर आधारित आहे.
नक्शलवादाचे मुख्य प्रकार (Types of Naxalism)
नक्षलवादाच्या दोन प्रमुख रूपांमध्ये शहरी नक्षलवाद आणि ग्रामीण नक्षलवाद यांचा समावेश होतो. दोन्ही प्रकारांमध्ये समान विचारसरणी असली तरी त्यांची कार्यपद्धती, प्रभाव क्षेत्र आणि सरकारच्या प्रतिसादात भिन्नता आहे.
खालीलप्रमाणे त्यांचा तुलनात्मक आढावा:
1.शहरी नक्षलवाद (Rural Naxalism)
शहरी नक्षलवाद म्हणजे शहरी भागांमध्ये कार्यरत असलेले नक्षलवादी गट किंवा त्यांच्या सहायक संघटना. हे गट प्रामुख्याने शहरी नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, वकील, पत्रकार इत्यादींच्या माध्यमातून आपली विचारधारा प्रसारित करतात. ते सेमिनार, कार्यशाळा, मोर्चे आणि आंदोलने आयोजित करून जनजागृती करतात आणि आपले समर्थन मिळवतात.
शहरी नक्षलवाद प्रकरणी आरोप असलेले अनेक उदाहरणे आहेत. त्यामध्ये 31 डिसेंबर 2017 साली कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचारानंतर शहरी नक्षलवाद प्रकरणी प्रकरणी अनेकांना अटक झाली होती.त्यामध्ये प्राध्यापक सुधा भारद्वाज याचाही समावेश होता. पुढे जवळपास अडीच वर्षानंतर म्हणजेच 2020 मध्ये प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांनाही या प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यावेळी प्राध्यापक तेलतुंबडे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतल्या NIA मुख्यालयात शरणागती पत्करली होती.
2.ग्रामीण नक्षलवाद (Urban Naxalism)
ग्रामीण नक्षलवाद म्हणजे ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये कार्यरत असलेले नक्षलवादी गट. हे गट मुख्यतः जंगलातील भागांमध्ये सक्रिय असतात आणि स्थानिक लोकांमध्ये आपली विचारधारा रुजवतात. ते शस्त्रास्त्र वापरून सरकारविरोधी लढा देतात आणि स्थानिक प्रशासनावर दबाव आणतात.
2.नक्षल चळवळीचा उगम
नक्षलबारी उठाव (1967): चळवळीची पहिली ठिणगी
नक्षल चळवळीचा उगम 1967 साली पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबारी या छोट्याशा गावात झाला. ही चळवळ एका स्थानिक जमिनीच्या वादातून सुरू झाली होती, पण तिच्या मागील पार्श्वभूमीत भारतातील सामाजिक आणि आर्थिक विषमता, दलित व आदिवासींचे शोषण, आणि शेतकऱ्यांची बेभरवशी अवस्था हे सर्व घटक कारणीभूत ठरले. नक्षलबारी गावातील शेतकऱ्यांनी जमीनदारांच्या अन्यायाविरुद्ध उभारलेल्या उठावात त्यांनी शस्त्रहस्त झाले आणि हे बंड एका मोठ्या चळवळीचे रूप घेऊ लागले. या उठावाचे नेतृत्व चारु मजूमदार, कानू सान्याल आणि जंगाल संथाल यांनी केले. त्यामुळे नक्षलबारी या गावातून सुरू झालेल्या या चळवळीला ‘नक्षलवादी’ असे नाव प्राप्त झाले.
चारु मजूमदार आणि विचारसरणी
चारु मजूमदार यांनी “ऐतिहासिक आठ दस्तऐवज” लिहून भारतीय राज्यव्यवस्थेविरोधात सशस्त्र क्रांतीचे आवाहन केले. त्यांचे विचार कार्ल मार्क्स, लेनिन आणि माओ झेडॉंग यांच्या क्रांतिकारी तत्त्वज्ञानावर आधारित होते. त्यांनी असा युक्तिवाद केला की, भारतीय राज्य एक शोषक यंत्रणा असून, याचा पाडाव केवळ सशस्त्र संघर्षानेच शक्य आहे. त्यांचा प्रभाव इतका होता की लवकरच भारताच्या अनेक भागांतून तरुण-तरुणी, विशेषतः शिक्षित वर्गातील, या चळवळीत सामील होऊ लागले.
सशस्त्र संघर्षासाठी स्वतंत्र पक्षाची निर्मिती
या चळवळीच्या वाढत्या प्रभावामुळे कम्युनिस्ट पक्षात विचारवंतांमध्ये फूट पडली आणि 1969 मध्ये ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट)’ म्हणजेच CPI(ML) या नव्या पक्षाची स्थापना झाली. या पक्षाने निवडणुका, संसदेचा मार्ग फेटाळून लावून सशस्त्र बंडालाच क्रांतीसाठी एकमेव मार्ग मानला. 1970 च्या दशकात राज्य सरकारने या चळवळीला दडपण्यासाठी कठोर पावले उचलली. चारु मजूमदार यांचा 1972 मध्ये कारागृहात मृत्यू झाला. परिणामी ही चळवळ काही काळ विसावली, परंतु ती पुन्हा नव्याने rural भागांमध्ये पुन्हा उभी राहिली.
1980 नंतर नक्षल चळवळीने शहरांपेक्षा ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये आपली मुळे खोलवर रोवली. गरीब शेतकरी, आदिवासी व मागासवर्गीय यांच्या असंतोषाचा फायदा घेत नक्षलवाद्यांनी छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आपली सत्ता निर्माण केली. 2004 मध्ये ‘People’s War Group’ आणि ‘Maoist Communist Centre of India’ या दोन प्रमुख संघटनांचे एकत्रीकरण होऊन ‘Communist Party of India (Maoist)’ ची स्थापना झाली. या टप्प्यानंतर नक्षल चळवळीने अधिक संघटित स्वरूप घेतले. आणि “रेड कॉरिडॉर” नावाच्या भागात त्यांचा प्रभाव वाढला.
3.कम्युनिस्ट विचारधारा व तिचा प्रभाव
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार, नक्षलवादी गटांची विचारधारा मुख्यतः हिंसा आणि सशस्त्र क्रांतीवर आधारित आहे. त्यांचा उद्देश विद्यमान राज्यव्यवस्था उलथवून टाकणे आणि “नवीन लोकशाही क्रांती” घडवून आणणे आहे. यासाठी ते “पीपल्स लिबरेशन गोरिल्ला आर्मी” (PLGA) या सशस्त्र पंखाचा वापर करतात, ज्याद्वारे ते स्थानिक प्रशासन, पोलिस, आणि पं.प्र. प्रतिनिधींना लक्ष्य करतात.
विचारधारेचा सामाजिक आणि विकासावर परिणाम
माओवादी हिंसाचारामुळे अनेक भागांमध्ये विकास प्रक्रिया मागे पडली आहे. शाळा, रस्ते, रेल्वे, आरोग्य सुविधा आणि इतर पायाभूत सुविधा नष्ट केल्याने स्थानिक लोकांच्या जीवनमानावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. माओवादी गट हे विकासाला विरोध करून लोकांना मागे ठेवण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे त्यांची विचारधारा कालबाह्य ठरते.
हिंसाचाराचे प्रमाण आणि गटांचा प्रभाव
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या 2023-24 च्या अहवालानुसार, CPI (Maoist) गट देशातील सर्वात प्रभावी वामपंथी उग्रवादी संघटना आहे, जी एकूण हिंसाचाराच्या 90% घटनांसाठी आणि resultant मृत्यूंच्या 95% साठी जबाबदार आहे. तथापि, त्यांचा प्रभाव आता केवळ 25 जिल्ह्यांपुरता मर्यादित आहे, ज्यामुळे त्यांच्या विचारधारेचा प्रभाव कमी झाला आहे
4.कम्युनिस्ट विचारसरणीच तोटे
कम्युनिस्ट विचारसरणीच्या अंमलबजावणीमध्ये अनेक तोटे दिसून आले आहेत, विशेषतः नक्षलवादी संदर्भात.
1.हिंसाचार आणि अराजकता
नक्षलवादी चळवळीने हजारो नागरिक, पोलिस आणि जवानांचा बळी घेतला आहे. सशस्त्र संघर्ष समाजात अस्थिरता निर्माण करतो.उदाहरणार्थ, छत्तीसगडमधील एक अतिरिक्त पोलिस अधीक्षक अकाश राव गिरेपुंजे यांचा आयईडी स्फोटात मृत्यू झाला. राज्यपालांनी या कृत्याला ‘दहशतवादी’ कृत्यं ठरवले होते.
2.व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच कम्युनिस्ट व्यवस्थांमध्ये व्यक्तिगत अभिव्यक्ती, धर्म आणि उद्योजकतेवर बंधने येतात. उदाहरणार्थ, सोव्हिएत युनियनमध्ये स्टॅलिनच्या काळात लाखो लोकांना तुरुंगात टाकले गेले तर चीनमध्ये सांस्कृतिक क्रांतीच्या वेळी लाखो लोकांचा बळी गेला.
3.विकासात अडथळा नक्षलप्रभावित भागांत रस्ते, शाळा, दवाखाने यांसारख्या विकासकामांना विरोध होतो. त्यामुळे हे भाग मागास राहतात.
4.सत्तेचे केंद्रीकरण कम्युनिस्ट धोरणांमधून लोकशाही प्रक्रियेला धक्का बसतो. सत्ता काही नेत्यांकडे केंद्रीत होते.
5.प्रेरणांचा अभाव सर्वांना सारखं वागवलं गेलं तर मेहनतीला किंवा कल्पकतेला दाद मिळत नाही.
6.गरिबी आणि अकार्यक्षमता ज्या देशांनी पूर्णपणे कम्युनिस्ट धोरण अवलंबलं (उदा. उत्तर कोरिया), तिथे मोठ्या प्रमाणात आर्थिक अकार्यक्षमता आणि जनतेची दैनावस्था दिसते.
एकुणच नक्षलवाद ही सुरुवातीला सामाजिक अन्यायाविरुद्धची चळवळ होती, पण हिंसक मार्गामुळे ती विकासात अडथळा ठरली. कम्युनिस्ट विचारधारेचे तोटेही स्पष्ट झाले आहेत. त्यामुळे समाजाने आणि शासनाने एकत्र येऊन संवाद, विकास आणि शिक्षणाच्या माध्यमातून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याची गरज निर्माण झाली आहे.