Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home संस्कृती

विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

param by param
Apr 17, 2024, 08:48 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

राज्यातील शेतकऱ्यावर जेव्हा जेव्हा संकट कोसळले तेव्हा सरकार धावून आले आहे. मागील दीड दोन वर्षात सरकारने शेतकऱ्यांसाठी ४५००० कोटी रुपये दिले आहेत. सोयाबीन, कापूस आणि संत्रा उत्पादकांच्या अडचणींवर सरकार काम करत आहे. आचारसंहिता संपल्यानंतर विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. 

रामटेक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ नरखेड येथे मंगळवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. आपले पहिले सरकार आहे जे शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कम उभे आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. राज्यात अवकाळी, गारपीट होतेय, निवडणुका जरी असल्या तरीसुद्धा आपण स्वतः प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की, “काही लोक शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवात की वर्ष २०२१-२२ मध्ये कापूसचा दर १३५०० रुपये प्रतिक्विंटल होता आता तितका भाव नाही. हे सत्य आहे, कारण जगामध्ये तेव्हा कापूस महाग होता. आपला दर जागतिक बाजारपेठेनुसार ठरतो. तेव्हा कापूस महाग असल्याने शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाले, मात्र आज कापसाचे भाव सगळीकडे कोसळले आहेत. त्यामुळे कापूस दर ८००० रुपये इतका आहे. जागतिक बाजारात कापसाचा दर हा अमेरिकेच्या कमॉडिटी मार्केटनुसार ठरवला जातो”. त्यामुळे कापसाच्या भावाचा आणि अगोदरच्या सरकारचा काडीचाही संबंध नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

संत्रा निर्यातीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “बांग्लादेशने आयात शुल्क २० रुपयांवरुन ८० रुपये केले. त्यामुळे आपल्याकडील संत्री बांग्लादेशला निर्यात होत नाहीत आचारसंहिता असल्याने थेट बोलता येणार नाही पण आचारसंहिता संपल्यानंतर कापूस, सोयाबीन आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही, असा शब्द त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला. देशाला विकासाकडे नेण्यासाठी तुमचे एक-एक मत महत्त्वाचे आहे”.

महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत आणि धनुष्यबाणाला मत म्हणजे नरेंद्र मोदी यांना मत, हे आपल्याला ठरवायचे आहे. येत्या १९ एप्रिल रोजी धनुष्यबाणाचे बटन दाबून राजू पारवे यांना विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी मतदारांना केले. रामटेक प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. जो रामाचा नाही तो कामाचा नाही असे म्हणत  दिल्लीत नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी राजू पारवे यांना विजयी करायचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. भाजपने जाहीरनाम्यात गरिबांना पुढील पाच वर्ष मोफत धान्य, मोफत वीज, मोफत गॅस कनेक्शन देण्याचे ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. काँग्रेसने गरीबी हटावचा नारा दिला पण गरिबी हटली नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली. याउलट मागील १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ कोटी लोकांना दारिद्र्यातून मुक्त केले, असे त्यांनी सांगितले.

Tags: eknath shindeloksabha electionsmahayutiraju paraveramtek
ShareTweetSendShare

Related News

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

म्हैसूर ‘पाक’वरून उठलेले राष्ट्रप्रेमाचे वादळ
राष्ट्रीय

म्हैसूर ‘पाक’वरून उठलेले राष्ट्रप्रेमाचे वादळ

शौर्याची शिकवण, उत्तराखंडच्या मदरसा अभ्यासक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’ चे धडे
राष्ट्रीय

शौर्याची शिकवण, उत्तराखंडच्या मदरसा अभ्यासक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’ चे धडे

एक मंदिर,एक विहीर, एक स्मशानभूमी, हिंदूंच्या एकतेसाठी संघाचा नवा संदेश
Latest News

एक मंदिर,एक विहीर, एक स्मशानभूमी, हिंदूंच्या एकतेसाठी संघाचा नवा संदेश

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.