Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home संस्कृती

पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या काँग्रेससोबत जाणाऱ्यांना लाज वाटायला हवी – मुख्यमंत्री

param by param
May 14, 2024, 03:28 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे. भाकरी भारताची खातात आणि चाकरी पाकिस्तानची करतात. शहिदांचा अपमान करणे आणि कसाबची बाजू घेणे हा काँग्रेसचा देशद्रोहीपणा आहे. बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्या उबाठांना काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसताना मनाची नाही तर जनाची लाज वाटायला हवी होती, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

पालघर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी वसईत आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते.

तीन वर्षांपूर्वी पालघरमध्ये साधू हत्याकांड झाले होते. त्या खटल्यात महाविकास आघाडी सरकारने आरोपींना पाठिशी घालून न्याय दिला नाही. मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर एकाही साधू संतांना हात लावण्याची हिम्मत कोणी करू शकणार नाही, असे काम सरकारने केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, काश्मीरमध्ये कलम ३७० हटवले तेव्हा राहून गांधी यांनी रक्ताचे पाट वाहतील असे म्हटले होते. मात्र गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी आणि दहशतवादाची बोलती बंद करून टाकली. काश्मिर मोकळा श्वास घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या सहकार्यामुळे लाल चौकात तिरंगा फडकला आहे.

अयोध्येमध्ये राम मंदिरांचे 500 वर्षांपासूनचे भारतीयांचे स्वप्न होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्वप्न पूर्ण केले. त्यामुळे आपण जय श्रीराम बोलतो. पण विरोधकांना याची पोटदुखी झाली असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

डॉ. हेमंत सावरा हे हाडाचे डॉक्टर असल्याने ते विरोधकांचा चांगलाच इलाज करतील, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. मी डॉक्टर नसलो तरी दोन वर्षांपूर्वी मोठे सर्जिकल ऑपरेशन केले. यावेळी गृहमंत्री अमित शाह पाठीशी राहिले. त्यामुळे आपले सरकार राज्यात काम करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मशालीने आग लावण्याचे उद्योग पालघरमध्ये सुरू आहेत. येत्या ४ जून रोजी विरोधकांची तोंडे कायमची बंद करा, असे मतदारांना आवाहन करत मशाल कायमची विझवण्याची वेळ आली आहे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटावर केली.

देशाच्या सुरक्षेमध्ये गृहमंत्री अमित शाह यांनी कधीही तडजोड केली नाही. संसदेत भाषण करताना ते म्हणाले होते की, जम्मू काश्मिर आणि पाकव्याप्त काश्मिरमधील एक एक इंच जमीन आपली आहे आणि ती मिळविण्यासाठी प्रसंगी प्राण देऊ. भारताची एक इंच जमीन कोणास देणार नाही अशी सिंहगर्जना अमित शाह यांनी केली होती, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत उबाठा गटाचे लोक शिव्या देतात. पण अमित शाह त्यांचेकडे बघत देखील नाहीत. जेव्हा अमित शाह तुमच्याकडे बघतील तेव्हा तुमचा सगळा कार्यक्रम होईल, असा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. काँग्रेससमोर लोटांगण घालणाऱ्या उबाठाने मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी देशद्रोही इकबाल मुसा याला प्रचारात उतरवले. या देशद्रोही पिलावळीला सोबत घेतलेले बघून बाळासाहेबांच्या मनाला किती यातना होत असतील. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना नकली शिवसेना संबोधले आहे. कारण बाळासाहेबांचे विचार, धनुष्यबाण आणि राज्यातील जनतेचे प्रेम आपल्यासोबत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Tags: bjpcongresseknath shindeloksabha electionsmahavikasaghadimahayutirashtravadi
ShareTweetSendShare

Related News

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

म्हैसूर ‘पाक’वरून उठलेले राष्ट्रप्रेमाचे वादळ
राष्ट्रीय

म्हैसूर ‘पाक’वरून उठलेले राष्ट्रप्रेमाचे वादळ

शौर्याची शिकवण, उत्तराखंडच्या मदरसा अभ्यासक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’ चे धडे
राष्ट्रीय

शौर्याची शिकवण, उत्तराखंडच्या मदरसा अभ्यासक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’ चे धडे

एक मंदिर,एक विहीर, एक स्मशानभूमी, हिंदूंच्या एकतेसाठी संघाचा नवा संदेश
Latest News

एक मंदिर,एक विहीर, एक स्मशानभूमी, हिंदूंच्या एकतेसाठी संघाचा नवा संदेश

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.