Friday, June 13, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home राष्ट्रीय

भारतीय शिष्टमंडळाने काय साध्य केले?

News Desk by News Desk
Jun 12, 2025, 02:03 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

Operation Sindoor: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर'(Operation Sindoor) राबवत दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले. यात शंभरहून अधिक दहशतवादी मारले गेले. त्यामुळे दहशतवादी नेटवर्कला मोठा धक्का बसला. परंतु भारताच्या या भूमिकेचा  काही आंतरराष्ट्रीय गट, संस्थांनी आणि मीडिया नेटवर्क्सनी खोटा प्रचार  करायला सुरवात केली होती. याच पार्श्वभूमीवर ‌’ऑपरेशन सिंदूर‌’ विषयी देशाची भूमिका जागतिक मंचावर सक्षमपणे मांडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय 7 शिष्टमंडळांची स्थापना केली होती. शिष्टमंडळांचे नेतृत्व कोणी करायचे आणि प्रत्येक शिष्टमंडळाने कोणकोणत्या देशांचे दौरे करायचे हे सरकारने निश्चित केले होते.

-या शिष्टमंडळांमध्ये एकूण 51 सदस्य होते.  त्यापैकी 31 प्रतिनिधी हे सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील होते. तर उर्वरित 20 सदस्य हे विरोधी पक्षांमधील होते. तसेच या शिष्टमंडळामध्ये ८ माजी राजदूतांचाही समावेश होता.

सात शिष्टमंडळांचे नेतृत्व कोणी केले, सदस्य आणि  कुठे दौरे केले:

–रविशंकर प्रसाद (भाजपा) – अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, ईयू, इटली आणि डेन्मार्कला भेट.

सदस्य- प्रियंका चतुर्वेदी,  गुला अली खटाना, डॉ. अमर सिंह ,समीक भट्टाचार्य ,MJ अकबर,
एम्बॅसडर पंकज सरन.

–बैजयंत पांडा (भाजपा)– सौदी अरेबिया, कुवेत, बहरीन आणि अल्जेरिया.

सदस्य: निशिकांत दुबे,असदुद्दीन ओवैसी, रेखा शर्मा, सतनाम सिंग सिंधू, एस. फांग्नोन कोन्याक,गुलाम नबी आझाद, हर्षवर्धन श्रृंगला

–श्रीकांत शिंदे (शिवसेना)– लायबेरिया, काँगो आणि सिएरा लिओनला, संयुक्त अरब अमिराती.

सदस्य: बांसुरी स्वराज, मनन कुमार मिश्रा, ET मोहम्मद बशीर,सस्मित पात्रा, अतुल गर्ग ,SS अहलूवालिया, व्ही. सुजन चिनॉय (माजी राजदूत)

– संजय कुमार झा (जेडीयू)-इंडोनेशिया, मलेशिया, कोरिया प्रजासत्ताक, जपान आणि सिंगापूर.

सदस्य: अभिषेक बनर्जी,डॉ. हिमंग जोशी, ब्रिज लाल, डॉ. जॉन ब्रिट्टास, अपराजिता सारंगी, युसूफ पठाण, प्रदान बरूआ, सलमान खुर्शीद, मोहन कुमार

–शशी थरुर (काँग्रेस)– अमेरिका, पनामा, गयाना, ब्राझील आणि कोलंबियाचा.

सदस्य: खासदार शांभवी, शशांक मणी त्रिपाठी, भुवनेश्वर कलिता, मिलिंद देवरा, सरफराज अहमद,जीएम हरीश बालयोगी, तरनजीत सिंग सिंधू, तेजस्वी सुर्या.

-सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी-शरद पवार गट) -इजिप्त, कतार, इथिओपिया आणि दक्षिण आफ्रिकेत दौरा.

सदस्य:प्रताप रूढी, विक्रमजीत सिंग साहनी, मनिष तिवारी, अनुराग सिंह ठाकूर, श्री कृष्ण देवरायालू, आनंद शर्मा, व्ही मुरलीधन, सय्यद अकबरूद्दीन.

-कनिमोझी करुणानिधी (द्रमुक)-  रशिया, स्लोव्हेनिया, ग्रीस, लाटविया आणि स्पेनला भेट.

सदस्य: खासदार राजीव राय, कॅप्टन ब्रीजेश चौपाटी, प्रेमचंद गुप्ता, अशोक कुमार मित्तल, मंजीव एस पुरी, जावेद अश्रफ, मिया अल्ताफ अहमद.

शिष्टमंडळातील सदस्य आणि मोदींची बैठक:

नुकतीच ही सर्व शिष्टमंडळे आपले नियोजीत दौरे पूर्ण करून भारतात परतली आहेत. या सात शिष्टमंडळांनी ३३ देशांचा दौरा पूर्ण केला आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व  शिष्टमंडळातील सदस्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० मे रोजी आपल्या सरकारी निवासस्थानी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शिष्टमंडळांच्या सदस्यांनी मोदींना विविध देशांमधील त्यांच्या बैठका आणि अनुभवांची माहिती दिली.

या बैठकीनंतर मोदींनी एक्सवरती पोस्ट करत म्हटले आहे की, वेगवेगळ्या देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध शिष्टमंडळांच्या सदस्यांना भेटलो. तसेच शिष्टमंडळातील सदस्यांसोबत शांततेसाठी भारताची वचनबद्धता आणि दहशतवादाच्या धोक्याचे उच्चाटन करण्याची गरज यावर सविस्तर चर्चा केली.

https://twitter.com/narendramodi/status/1932462724094583157 

याच पार्श्वभूमीवर आपण या सात शिष्टमंडळांनी केलेल्या विविध देशांच्या दौऱ्यादरम्यान नेमके काय घडले याची सविस्तर माहिती घेऊयात.

शशी थरूर यांच्या शिष्टमंडळाने केला अमेरिका दौरा:

– 3 जून रोजी शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ अमेरिका दौऱ्यावर पोहचले होते. त्यानंतर तीन दिवस हे शिष्टमंडळ अमेरिका दौऱ्यावर होते.

-या तीन दिवसांच्या कालावधीत भारत कॅपिटल हिल तसेच वॉशिंग्टनमध्ये विस्तृत बैठका झाल्या.

– व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे उपाध्यक्ष  व्हान्स यांच्यासोबत शिष्टमंडळाची  सुमारे २५ मिनिटे बैठक झाली. व्हान्स यांनी पहलगाम हल्ल्याबद्दल राग व्यक्त केला.

-व्हान्स यांच्यासोबतच्या भेटीचे वर्णन शशी थरूर यांनी “एक उत्कृष्ट बैठक” असे केले .

– शिष्टमंडळाने अमेरिकन काँग्रेस सदस्य, थिंक टँक, धोरण तज्ञ, मीडिया तसेच भारतीय-अमेरिकन समुदायाच्या सदस्यांसोबत बैठका घेतल्या आणि संवाद साधला.

-या दौऱ्यादरम्यान अमेरिकेने भारताच्या दहशतवादविरोधी भूमिकेला जाहीरपणे पाठिंबा दर्शविला.

5.संजय झा यांच्या शिष्टमंडळाचा जपान दौरा:

संजय झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने 22 मे रोजी जपान दौरा केला होता.

-22 मे रोजी जपानच्या टोकियो शहरात जपानच्या नेत्यांसोबत शिष्टमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान जपानचे परराष्ट्र मंत्री ‘ताकेशी इवाया’ यांनी दहशतवादी कारवायांबद्दल चिंता व्यक्त केली.

-तसेच बैठकीदरम्यान इवाया यांनी गुन्हेगारांना न्यायाच्या चौकटीत आणले पाहिजे यावर भर दिला.

-जपाननेही भारताच्या दहशतवाद विरोधी कारवाईला  जाहीरपणे पाठिंबा दर्शविला.

-या शिष्टमंडळाने जपानच्या प्रमुख माध्यमांशीही संवाद साधला आणि भारताच्या शून्य-सहिष्णुता धोरणाची, तसेच पाकिस्तान दहशतवाद्यांना देत असलेल्या पाठिंब्यांची माहिती दिली.

श्रीकांत शिदेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचा युनायटेड अरब अमिरातीचा दौरा:

-खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ २२ मे रोजी युनायटेड अरब अमिराती दौऱ्यावर दाखल झाले होते.

– २२ मे रोजी अबू धाबी येथील राष्ट्रीय माध्यम कार्यालयाचे महासंचालक डॉ. जमाल मोहम्मद ओबैद अल काबी यांच्याशी शिष्टमंडळाची भेट.

– यावेळी डॉ. जमाल मोहम्मद ओबैद अल काबी यांनी दहशतवादी संघटना आणि दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशासोबत युनायटेड अरब अमिराती कधीही उभे राहणार नाही, असे आश्वासन भारताला दिले.

-एकंदरित युनायटेड अरबने जाहीरपणे भारताच्या दहशतवादा विरोधातल्या लढ्याला समर्थन दिले.

सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचा कतार दौरा: 

-२६ मे रोजी हे शिष्टमंडळ कतार दौऱ्यावर होते.

– या शिष्टमंडळाने कतार सरकारमधील कतारी मान्यवर, माध्यमांचे सदस्य, शैक्षणिक संस्था, विचारवंत तसेच कतारमधील भारतीय समुदायाशी  संवाद साधला.

– तसेच या शिष्टमंडळाने कतारची सर्वोच्च कायदेमंडळ संस्था असलेल्या ‘शूरा कौन्सिल’ ची ही भेट घेतली. या संस्थेने  भारताला स्पष्ट पाठिंबा दिला. कोणत्याही स्वरूपातला दहशतवाद जिथेही असेल तिथून तो नष्ट केला पाहिजे आणि तो उपटून टाकला पाहिजे असे मतही या संस्थेद्वारे व्यक्त करण्यात आले.

-सुप्रिया सुळे यांनी कतार संसदेच्या सदस्यांशी झालेल्या बैठकीनंतर स्पष्ट केले होते की, दहशतवाद रोखण्यात आणि भ्रष्टाचारावर ‘शून्य-सहिष्णुता धोरण’ राखण्यात कतार संसद सदस्यांचे मत भारतासारखेच आहे.

8.रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचा फ्रान्स दौरा:

-हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ २५ ते  २७ मे दरम्यान फ्रान्स दौऱ्यावर होते.

– या शिष्टमंडळाने फ्रेंच सिनेटच्या सदस्या जॅकलिन युस्टाच-ब्रिनियो यांच्या नेतृत्वाखालील फ्रेंच सिनेटरची भेट घेतली होती.

– या नंतर फ्रान्सच्या सिनेट सदस्यांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारतासोबत ‘एकता’ असल्याचे स्पष्ट केले.

– या शिष्टमंडळाने पॅरिसमधील विविध थिंक-टँकची भेट घेतली आणि दहशतवादाविरुद्ध भारताचा ठाम आणि स्पष्ट संदेश दिला. तसेच जगासमोर दहशतवादाने निर्माण केलेल्या आव्हानावर चर्चा केली.

-या शिष्टमंडळाने फ्रान्समध्ये भारतीय समुदायाच्या सदस्यांची भेट घेतली तसेच दहशतवादाविरुद्ध भारताची मजबूत आणि एकजूट भूमिका व्यक्त केली.

-दरम्यान, दहशतवाद विरोधातल्या भारताच्या लढाईला फ्रान्सने एकमताने पाठिंबा जाहीर केला आहे

 कनिमोझी करुणानिधी यांचा स्पेन दौरा:

कनिमोझी करणानिधी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ  ३१ मे रोजी स्पेन दौऱ्यावरती पोहचले होते.
या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने स्पेनचे परराष्ट्र मंत्री ‘जोस मॅन्युएल अल्बारेस’ यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर अल्बारेस यांनी दहशतवादाचा मुकाबला करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना स्पेनचा स्पष्ट पाठिंबा दर्शविला. तसेच स्पेनने भारताच्या दहशतवादा विरोधातल्या लढाईत स्पेन कायम भारतासोबत राहिल असेही दर्शविले.
या शिष्टमंडळाने स्पेनमध्ये दहशतवाद पिडीतांच्या एका संघटनेशीही संवाद साधला.
-विशेष म्हणजे कनिमोझी यांच्या एका वक्तव्यामुळे या शिष्टमंडळाचा स्पेन दौरा चांगलाच चर्चेत आला.

-माध्यमांशी आणि अनिवासी भारतीयांशी संवाद साधताना कनिमोझी यांना भारताच्या राष्ट्रभाषेच्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, कनिमोझी म्हणाल्या, “भारताची राष्ट्रभाषा एकता आणि विविधता आहे, हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ जगाला हाच संदेश देण्यासाठी आले आहे.”

 संजय झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचा इंडोनेशिया दौरा:

२८ मे रोजी हे शिष्टमंडळ इंडोनेशिया दौऱ्यावर दाखल झाले होते.या शिष्टमंडळाचा एकूण चार दिवसांचा इंडोनेशिया दौरा होता.
या दोऱ्यादरम्यान भारतीय शिष्टमंडळाने इंडोनेशिया सरकारमधील अनेक सदस्यांची भेट घेतली.
इंडोनेशियात या शिष्टमंडळाने भारताचे दहशतवाद विरोधातले धोरण तसेच दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांच्या विरोधातली भारताची भूमिका स्पष्ट केली.
इंडोनेशियाच्या परराष्ट्र व्यवहार उपमंत्री अरिफ हवास ओग्रोसेनो यांनी इंडोनेशिया भारताप्रमाणेच दहशतवादाला शून्य सहनशीलता दाखवतो, यावर भर दिला.
तसेच दहशतवाद मानवतेच्या विरोधात असल्याचेही इंडानेशियाने स्पष्ट केले तसेच भारताच्या भूमिकेचे समर्थनही केले.

श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचा कांगो दौरा:

-श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काॅंगो दौऱ्यावर गेले होते.

-यावेळी श्रीकांत शिंदे यांनी काॅंगोमध्ये दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानवर जोरदार टीका केली.

–  पाकिस्तानने कशाप्रकारे दहशतवादाला पोसले आहे आणि गेल्या काही वर्षांत भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची माहिती काॅंगो सरकारच्या प्रतिनिधींना देण्यात आली तेव्हा त्यांनी भारतासोबत एकता दर्शविली.

– काँगो सरकारच्या प्रतिनिधींनी गेल्या चार दशकांपासून पाकिस्तानने भारतावर केलेल्या अतिरेकी दहशतवादाबद्दल दुःखही व्यक्त केले.

एकंदरित काॅंगो सरकारच्या प्रतिनिधींसोबत झालेली शिष्टमंडळाची बैठक यशस्वी झाली.

शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचा ब्राझील दौरा:

– हे शिष्टमंडळ १ ते २ जून दरम्यान ब्राझील दौऱ्यावर होते.

– शिष्टमंडळाने ब्राझीलचे उपराष्ट्रपती गेराल्डो अल्कमिन, राष्ट्रपतींचे मुख्य सल्लागार राजदूत सेल्सो अमोरिम यांसारख्या अनेक महत्वपूर्ण नेत्यांसोबत बैठका घेतल्या.

-शिष्टमंडळाने दहशतवादामुळे जागतिक शांतता आणि स्थिरतेला निर्माण झालेल्या धोका अधोरेखीत केला.

-ब्राझीलचे उपराष्ट्रपती गेराल्डो अल्कमेन यांनी दहशतवादा विरुद्धच्या भारताच्या लढाईला पूर्ण पाठिंबा दर्शवला. तसेच पहलगाम हल्ल्याबद्दल ब्राझील सरकारची सहानुभूती स्पष्टपणे व्यक्त केली.

शशी थरूर यांच्या शिष्टमंडळाचा कोलंबिया दौरा:

– भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये जेव्हा  दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता, तेव्हा कोलंबिया सरकारने शोक व्यक्त केला होता.

-परंतु भारतीय शिष्टमंडळाने कोलंबिया सरकारच्या या प्रतिक्रियेमुळे आम्हाला निराशा झाली आहे, असे मत या दौऱ्यादरम्यान व्यक्त केले आणि भारताची भूमिका कोलंबिया सरकारला समजावून सांगितली.

– त्यानंतर कोलंबिया सरकारने ते विधान मागे घेतले. तसेच भारताच्या भूमिकेचे समर्थन केले

-त्यामुळे शिष्टमंडळाला कोलंबिया दौऱ्यादरम्यान मोठे यश भेटले.

कनिमोझी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालील रशिया दौरा:

– रशिया दौऱ्याविषयी बोलताना कनिमोझी म्हणाल्या की, रशियाच्या सर्वच नेत्यांना भारताचे शिष्टमंडळ नेमके कशासाठी आले आहे हे समजले.

-रशियाने दहशतवादाविरूद्ध लढण्याचे आणि दहशतवादाविरूद्ध एकत्रितपणे आवाज उठवण्याचे आश्वासन दिले आहे.

-रशियाचे भेटीचे वर्णन करताना कनिमोझी यांनी ‘अतिशय सकारात्माक भेट’ असे वर्णन केले होते.

दरम्यान, या शिष्टमंडळांनी विविध देशांमध्ये जाऊन तिथल्या सरकारी प्रतिनिधींशी, माध्यमांशी, तेथील जनतेशी संवाद साधून भारताच्या दहशतवाद विरोधाची भूमिका देत खोट्या प्रचाराला शास्त्रीय, घटनात्मक आणि मानवाधिकार आधारे प्रत्युत्तर दिले असे म्हणावे लागेल. तसेच शिष्टमंडळांनी विविध देशांशी जाऊन प्रत्यक्ष चर्चा केल्याने एकाप्रकारे भारतासोबतचे राजनैतिक आणि धोरणात्मक सहकार्य वाढवले असेही म्हणता येईल.

-विशेष म्हणजे या शिष्टमंडळात भारतातील विविध राज्ये, धर्म आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश असल्याने जगासमोर भारतीय एकता आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर एकमताचा संदेश गेला हे अत्यंत महत्वाचे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे भारतात लोकशाहीचा प्रभाव कमी होत आहे तसेच वाढत्या बहुसंख्यवादासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदी सरकारवर टीका होत असताना मोदी सरकारने या शिष्टमंडळात सर्व धर्मांच्या नेत्यांचा समावेश करत ‘विविधतेत एकता’ हाच खरा भारत आहे, हेही जगासमोर मांडले.

एकंदरित,शिष्टमंडळ जगभर पाठवण्याच्या  जो भारत सरकारचा हेतू होता तो यशस्वी झाल्याचे दिसते. कारण जवळपास सर्वच देशांनी भारताच्या दहशतवाद विरोधी भूमिकेला जाहीरपणे पाठिंबा दर्शविला आहे.

Tags: america india relationnarendra modishashi tharursupriya suleTOP NEWSusa
ShareTweetSendShare

Related News

बिकट काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच देशासोबत ठामपणे उभा!
राष्ट्रीय

बिकट काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच देशासोबत ठामपणे उभा!

RSS चे सहा शिल्पकार: सरसंघ चालकांचे व्यक्तिमत्व विचार व कार्य
राज्य

RSS चे सहा शिल्पकार: सरसंघ चालकांचे व्यक्तिमत्व विचार व कार्य

पंच परिवर्तन (भाग -१ )
राज्य

पंच परिवर्तन (भाग -१ )

मोदी सरकारचे ऊर्जा बचतीसाठी मोठे पाऊल ,एसीच्या वापराबाबत नवीन नियमावली येणार
राष्ट्रीय

मोदी सरकारचे ऊर्जा बचतीसाठी मोठे पाऊल ,एसीच्या वापराबाबत नवीन नियमावली येणार

संरक्षण क्षेत्रात क्रांती घडवणारी क्षेपणास्त्रे
राष्ट्रीय

संरक्षण क्षेत्रात क्रांती घडवणारी क्षेपणास्त्रे

Latest News

बिकट काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच देशासोबत ठामपणे उभा!

बिकट काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच देशासोबत ठामपणे उभा!

RSS चे सहा शिल्पकार: सरसंघ चालकांचे व्यक्तिमत्व विचार व कार्य

RSS चे सहा शिल्पकार: सरसंघ चालकांचे व्यक्तिमत्व विचार व कार्य

पंच परिवर्तन (भाग -१ )

पंच परिवर्तन (भाग -१ )

मोदी सरकारचे ऊर्जा बचतीसाठी मोठे पाऊल ,एसीच्या वापराबाबत नवीन नियमावली येणार

मोदी सरकारचे ऊर्जा बचतीसाठी मोठे पाऊल ,एसीच्या वापराबाबत नवीन नियमावली येणार

राज्य सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा!

राज्य सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा!

संरक्षण क्षेत्रात क्रांती घडवणारी क्षेपणास्त्रे

संरक्षण क्षेत्रात क्रांती घडवणारी क्षेपणास्त्रे

भारतीय शिष्टमंडळाने काय साध्य केले?

भारतीय शिष्टमंडळाने काय साध्य केले?

विश्वबंधुत्व जपणारे भारतीय नौदल

विश्वबंधुत्व जपणारे भारतीय नौदल

समृद्धी महामार्गाला विकासाचा अधारस्तंभ बनणारे ७ पैलू

समृद्धी महामार्गाला विकासाचा अधारस्तंभ बनणारे ७ पैलू

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.