राज्यातील महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सूट तसेच ज्येष्ठ नागरिकांना फुकट प्रवास अशा सवलती दिल्या जात आहेत. या योजनांवर नुकतंच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाष्य केलं आहे. त्यामुळे आता या सवलती बंद होणार का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
महिला आणि ज्येष्ठ नागरिकांन दिलेल्या सवलतींमुळे एसटी तोट्यात गेल्याचं राज्याचे प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. धाराशिवमध्ये ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
पत्रकारांना एसटी प्रवासात सवलत मिळावी अशी मागणी पत्रकारांनी यावेळी केली. यावर बोलताना प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे की, ‘महिलांना व जेष्ठ नागरिकांना देण्यात आलेल्या सवलतीमुळे एसटी तोट्यात गेली आहे. महिला आणि ज्येष्ठांना एसटी प्रवासात सवलत दिल्याने एसटीला दर दिवशी 3 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. आणि म्हणूनच यापुढे एसटीमध्ये कोणतीच सवलत नाही असं वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आलं. लाडक्या बहिणींना बस मध्ये 50 टक्के सवलत ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस या सवलतीमुळे परिस्थिती अशी झाली आहे. अशीच सवलत आपण जर सर्वांना देत बसलो तर मला असं वाटतं महामंडळ चालवणं कठीण होईल. असं भाष्य त्यांनी यावेळी केलं.
तसेच पुढे ते म्हणाले आहेत की, ‘गाव खेड्यापर्यंत एसटी पोहोचली पाहिजे. ज्या भागात एसटी जात नाही, त्या भागात एसटी पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.’
दरम्यान, आता परिवहन मंत्र्यांनी केलेलं हे वक्तव्य चर्चेत आले आहे. प्रताप सरनाईक यांच्या या वक्तव्यानंतर एसटी प्रवासात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत बंद होणार का? अशा चर्चा लागू लागल्या आहेत.