Tuesday, July 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home गुन्हेविश्व

भाग २ -महाराष्ट्रातील धार्मिक दंगलींची पार्श्वभूमी

News Desk by News Desk
Apr 23, 2025, 08:27 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

महाराष्ट्र, एक प्रगतशील आणि औद्योगिक दृष्ट्या संपन्न राज्य, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्याही अतिशय विविधतेने नटलेले आहे. मात्र, या विविधतेच्या अंगाखांद्यावर अधूनमधून धार्मिक दंगलीचे दाहक वादळ घोंगावत आले आहे. राज्याची पुरोगामी ओळख पाहता या दंगली चिंताजनक आहेत. अनेकदा यावरून राज्याचे राजकीय वातावरण देखील चांगलचे तापलेले अनेकदा दिसून आले आहे. राज्यकर्ते आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडत असतात. पण फक्त राजकीय विषयच नाही तर या दंगलींच्या पार्श्वभूमीकडे पाहताना आपल्याला ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व आर्थिक घटकांचा देखील सखोल अभ्यास करावा लागतो.

ऐतिहासिक पार्श्वभूमी:

ब्रिटिश काळात इंग्रजांनी ‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती राबवून हिंदू-मुस्लिम समाजात दरी निर्माण केली.तसेच त्यांनी हिंदू-मुस्लिम समाजात द्वेष निर्माण करणारी धोरणे राबवली.त्याचा परिणाम पुढे दीर्घकाळ जाणवला. १९६० च्या दशकात नागपूर, मुंबई आणि औरंगाबादमध्ये (आजचे छ.संभाजीनगर) धार्मिक तणावाचे प्रसंग घडले होते. विशेषतः हिंदू-मुस्लिम संबंधांत उग्रतेची छाया जाणवू लागली. १९व्या शतकात हिंदू व मुस्लिम समाजात धार्मिक ओळख जागृत झाली. समाजसुधारणांबरोबरच धार्मिक संघटनांची निर्मिती झाली (जसे की आर्य समाज, मुस्लिम लीग).

राजकीय हस्तक्षेप आणि ध्रुवीकरण:

१९८०-९० च्या दशकात, महाराष्ट्रातील राजकारणात धार्मिक ओळख हा एक प्रभावशाली मुद्दा झाला. बाबरी मशीद पाडल्यानंतर १९९२-९३ मध्ये मुंबईमध्ये झालेली दंगल ही अत्यंत भयावह ठरली. यामध्ये सुमारे 900 लोक मरण पावले, हजारो लोक बेघर झाले. तर अनेक दुकाने, घरे, मशिदी, मंदिरे यांचे खूप नुकसान झाले.त्यानंतरच्या काळात अनेक छोट्या-मोठ्या घटना राज्यात घडल्या, ज्या केवळ स्थानिक कारणांमुळेच नव्हे तर राजकीय पक्षांच्या सत्तासंघर्षांमुळेही भडकल्या.

सामाजिक-आर्थिक कारणे:

धार्मिक दंगली केवळ धार्मिक मतभेदांमुळे होत नाहीत. बेरोजगारी, शिक्षणाचा अभाव, झोपडपट्ट्यांमधील दैन्यावस्था यामुळे समाजात असंतोष वाढतो, जो अनेकदा धार्मिक आधारावर व्यक्त होतो. याला जर राजकीय पाठींबा मिळाला, तर मग त्याचे रुपांतर दंगलीमध्ये होते.

माध्यमांची आणि सोशल मीडियाची भूमिका:

अफवा, चुकीची माहिती, आणि धार्मिक भावना भडकवणारे मेसेज हे सोशल मीडियावरून पसरतात, ज्यामुळे तणाव वाढतो. तर काही वेळा माध्यमांनी चुकीची माहिती पसरवून तणाव वाढवला आहे, तर काही वेळा त्यांनी खऱ्या घटनेला उजाळा देऊन समाजात समंजसपणा वाढवण्याचे काम केले आहे. सोशल मीडियाचा अलीकडील प्रभावदेखील दंगलींमध्ये निर्णायक ठरू शकतो.

वस्तुतः महाराष्ट्रात अनेक जातीय आणि धार्मिक दंगली घडल्या आहेत त्याविषयीची माहिती आपण पुढे पाहणारच आहोत पण उदाहरणासाठी आपण 1970 च्या भिवंडी दंगलीविषयी थोडी माहिती जाणून घेऊयात.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी हे शहर म्हणजे एक महत्त्वाचे यंत्रमाग उद्योगांचे केंद्र. इथे हिंदू व मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणावर राहतात.भिवंडीमढील यंत्रमाग उद्योगांमध्ये बहुतांश कामगार मुस्लिम तर मालक हिंदू होते.कामगार संघटनांमध्ये मुस्लिम वर्चस्व होते. त्यामुळे तणाव निर्माण होत होता. दिनांक 7 मे रोजी हिंदू संघटनांनी शिवजयंती रॅली काढण्याचे ठरवले होते. पण जेंव्हा रॅली मुस्लिमबहुल भागातून नेण्यात आली. तेंव्हा मुस्लिम समाजातील लोकांनी या विरोधात प्रतिक्रिया दिली. दुसरीकडे स्थानिक राजकारणात दोन्ही समुदायांचा प्रभाव वाढत होता. त्यातच काही स्थानिक राजकारणी आणि धार्मिक नेत्यांनी परिस्थिती अधिक चिघळवली. त्यामुळे मोठी दंगल उसळली. या दंगलीत 400 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले,1000 हून अधिक जखमी झाले, शेकडो घरे आणि दुकाने जाळण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारने दंगल नियंत्रणासाठी लष्कर पाचारण केले. शांतता समित्या स्थापन करण्यात आल्या. परंतु, दीर्घकालीन सामाजिक समेटाच्या दिशेने फारसे काही केले गेले नाही.

थोडक्यात भिवंडी दंगल ही केवळ धार्मिक दंगल नव्हती, तर ती आर्थिक, सामाजिक व राजकीय तणावांची स्फोटक परिणती होती. यामध्ये सरकार, पोलीस आणि राजकीय पक्षांची भूमिका तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात धार्मिक दंगलींचा इतिहास हा सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक घटकांनी प्रेरित आहे. ह्या दंगली फक्त धर्मांधतेचा परिणाम नाहीत, तर व्यवस्थात्मक अपयशाचे आणि राजकीय हेतूंचेही प्रतिबिंब आहेत. आपण सर्वांनी मिळून समावेशकतेच्या दिशेने वाटचाल केली, तर धार्मिक तेढांचे हे सावट कमी करता येऊ शकते. दंगली होण्यामागे सामाजिक, राजकीय व आर्थिक घटकांसह आणखी कोणते घटक कारणीभूत आहेत ते आपण पुढच्या भागात जाणून घेणार आहोत.

या सिरीजचा पुढचा भाग- भाग 3 आधुनिक काळात महाराष्ट्रात दंगली का घडतात?

Tags: BADI BAATmaharashtra riotsmaharshtrareligious riots
ShareTweetSendShare

Related News

कारगिल युद्धाचा शेरशाह – विक्रम बत्रा
इतिहास,संस्कृती

कारगिल युद्धाचा शेरशाह – विक्रम बत्रा

आषाढी वारी: भक्ती आणि श्रद्धेचा अलौकिक सोहळा
राज्य

आषाढी वारी: भक्ती आणि श्रद्धेचा अलौकिक सोहळा

ड्रग्जतस्करीला ‘मकोका’ लागणार; ड्रग्जचा विळखा महाराष्ट्र पोखरतोय?
गुन्हेविश्व

ड्रग्जतस्करीला ‘मकोका’ लागणार; ड्रग्जचा विळखा महाराष्ट्र पोखरतोय?

पंढरीच्या वारीत समाजविघातक प्रवृत्तींकडून धर्मपरिवर्तनाचे प्रयत्न
राज्य

पंढरीच्या वारीत समाजविघातक प्रवृत्तींकडून धर्मपरिवर्तनाचे प्रयत्न

आणखी किती ढोंगी बाबा! पुण्यातील प्रसाद बाबाच्या कारनाम्यामुळे सर्वत्र खळबळ
राज्य

आणखी किती ढोंगी बाबा! पुण्यातील प्रसाद बाबाच्या कारनाम्यामुळे सर्वत्र खळबळ

Latest News

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘क्रांतिकारी उडीची’ ११५ वर्षे

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘क्रांतिकारी उडीची’ ११५ वर्षे

कारगिल युद्धाचा शेरशाह – विक्रम बत्रा

कारगिल युद्धाचा शेरशाह – विक्रम बत्रा

आषाढी वारी: भक्ती आणि श्रद्धेचा अलौकिक सोहळा

आषाढी वारी: भक्ती आणि श्रद्धेचा अलौकिक सोहळा

लक्ष्मीबाई केळकर तथा मावशी केळकर यांची जयंती

लक्ष्मीबाई केळकर तथा मावशी केळकर यांची जयंती

ABVP: विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारी संघटना

ABVP: विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारी संघटना

भारतीय किसान संघाची आजवरची शेतकऱ्यांसाठीची भूमिका

भारतीय किसान संघाची आजवरची शेतकऱ्यांसाठीची भूमिका

स्वदेशी विचारसरणीचा संकल्प भारताला अत्युच्च स्थानावर पोचवेल (पंच परिवर्तन भाग -3 )

स्वदेशी विचारसरणीचा संकल्प भारताला अत्युच्च स्थानावर पोचवेल (पंच परिवर्तन भाग -3 )

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

ड्रग्जतस्करीला ‘मकोका’ लागणार; ड्रग्जचा विळखा महाराष्ट्र पोखरतोय?

ड्रग्जतस्करीला ‘मकोका’ लागणार; ड्रग्जचा विळखा महाराष्ट्र पोखरतोय?

पंढरीच्या वारीत समाजविघातक प्रवृत्तींकडून धर्मपरिवर्तनाचे प्रयत्न

पंढरीच्या वारीत समाजविघातक प्रवृत्तींकडून धर्मपरिवर्तनाचे प्रयत्न

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.